शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

"एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी; कोट्यवधींचे रस्ते रद्द केलेच कसे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:23 IST

"राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्षे लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण-डोंबिवलीत विकासकामांत झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते."

डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील  काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा आदेश देणारे खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी केला. शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याबाबत वस्तुस्थिती सांगण्यासाठी शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर चव्हाण यांनी सादर केल्या. 

मी युती सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत एमएमआरडीएच्या माध्यमातून काँक्रिटचे रस्ते व्हावेत, अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली होती. त्याला फडणवीस यांनी तत्काळ मान्यता दिली. केडीएमसीपेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्या प्रकारे रस्ते बांधणी करेल, असेही ठरले. त्या कामासाठी ४७०.८२ कोटी रुपये मंजूर झाले. त्यातून डोंबिवलीतील ३४ रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले. रस्त्यांचा हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नऊ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

ते  पुढे म्हणाले की, मी अडीच वर्षे याबाबत पाठपुरावा करत होतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची सहन होत नाही व सांगता येत नाही, अशी  देहबोली स्पष्ट दिसत होती. अधिकारी याबाबत प्रचंड दबावाखाली होते. प्राधिकरणातर्फे ३० रस्ते कामे रद्द केल्याचे खासगीत सांगत होते. जेव्हा कागदपत्रे प्राप्त झाली, तेव्हा लक्षात आले की, डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचे काम शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे. 

केडीएमसीत शिवसेना २३ वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत मनपाच्या पाच निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना-भाजप एकत्र तसेच विरोधात अशी राजकीय लढाई लढलो, पण भाजपने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिकाच निभावली. उलट शिवसेनेने स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला शिवसेनेने कायम खोडा घातला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्षे लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण-डोंबिवलीत विकासकामांत झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते, असा आरोपही चव्हाण यांनी केला. 

भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या फायली दाबून ठेवल्या केडीएमसीतील भाजप नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवणे. भाजप आमदारांच्या फायली आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना केडीएमसीत येऊच न देणे, हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरू आहे. या विरोधात भाजप म्हणून त्या पातळीवर संघर्ष करत असतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. स्वार्थी हेतूने डोंबिवलीच्या विकासात अडथळा  आणण्याचे काम २० वर्षांपासून शिवसेना करत आहे. हे मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे दुर्दैव आहे, असे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना