शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

मयुरी चव्हाण "ठाणे जिल्ह्यातील भूमिपूत्रांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. या  गोष्टीची कल्पना पंतप्रधानांना आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामाला तरी १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मात्र ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता. आता आपल्याला केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी जिल्ह्याचा हा वनवास संपवला आहे," असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपाचे  भिवंडी मतदारसंघाचे  खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यामधून  भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान कल्याण शीळ मार्गावरही कपिल पाटील यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत संघर्ष समितीच्यावतीने त्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले आहे. पुढे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी लाभली असून मोदी है तो सब कुछ मुमकिन है असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व समस्या आपल्याला माहित आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम आपण करणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता.

जिल्ह्याचा वनवास संपविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील विविध निवडणूकांमध्ये  विशेष करून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रामुख्याने  कपिल पाटील यांच्या पुढाकाराने रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेShiv Senaशिवसेना