शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

मयुरी चव्हाण "ठाणे जिल्ह्यातील भूमिपूत्रांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. या  गोष्टीची कल्पना पंतप्रधानांना आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामाला तरी १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मात्र ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता. आता आपल्याला केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी जिल्ह्याचा हा वनवास संपवला आहे," असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपाचे  भिवंडी मतदारसंघाचे  खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यामधून  भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान कल्याण शीळ मार्गावरही कपिल पाटील यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत संघर्ष समितीच्यावतीने त्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले आहे. पुढे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी लाभली असून मोदी है तो सब कुछ मुमकिन है असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व समस्या आपल्याला माहित आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम आपण करणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता.

जिल्ह्याचा वनवास संपविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील विविध निवडणूकांमध्ये  विशेष करून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रामुख्याने  कपिल पाटील यांच्या पुढाकाराने रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेShiv Senaशिवसेना