शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

मयुरी चव्हाण "ठाणे जिल्ह्यातील भूमिपूत्रांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. या  गोष्टीची कल्पना पंतप्रधानांना आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामाला तरी १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मात्र ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता. आता आपल्याला केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी जिल्ह्याचा हा वनवास संपवला आहे," असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपाचे  भिवंडी मतदारसंघाचे  खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यामधून  भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान कल्याण शीळ मार्गावरही कपिल पाटील यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत संघर्ष समितीच्यावतीने त्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले आहे. पुढे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी लाभली असून मोदी है तो सब कुछ मुमकिन है असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व समस्या आपल्याला माहित आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम आपण करणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता.

जिल्ह्याचा वनवास संपविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील विविध निवडणूकांमध्ये  विशेष करून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रामुख्याने  कपिल पाटील यांच्या पुढाकाराने रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेShiv Senaशिवसेना