शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

"तीन तिघाडी, काम बिघाडी असे निष्क्रिय आघाडी सरकार, नागरिकांना दिला वीजबिलांचा शॉक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 12:37 IST

BJP And Electricity Bill : वीजबिल कमी व्हायलाच हवे, शासनाकडे दाद मागायची नाही तर कोणाकडे मागायची असा सवाल मोरे यांनी केला. 

डोंबिवली - वाढीव वीजबिलासंदर्भात एक रुपया कमी करणार नाही असे जाहीर करून राज्य शासनाबद्दलचा जनतेच्या मनातील विश्वास उडाला आहे. असे हे तीन तिघाडी काम बिघाडी आघाडी सरकार असून त्याचा भाजपा कल्याण जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे वक्तव्य पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले. सोमवारी भाजपातर्फे कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड, संजय मोरे यांच्या माध्यमातून महावितरणच्या तेजश्री, डोंबिवलीत मंडल ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिल वाढीविरोधात एमयडीसीच्या महावितरण कार्यालयाबाहेर जनआंदोलन करण्यात आले.

कांबळे यांनी वीज बिलांचा शॉक या सरकारने नागरिकांना दिला, कोरोना काळात आरोग्याची हेळसांड सुरू असताना आणखी आर्थिक भुर्दंड देऊन समान्यांचे हाल सुरू केलेल्या या आघाडी सरकारने निर्णय बदलणे गरजेचे आहे असं म्हटलं आहे. वीज, पाणी, रस्ते, दळणवळण सुविधा या सगळ्याच मूलभूत प्रश्नांचे, गरजांचे तीनतेरा या सरकारने वाजवले आहेत, सांगा कसं जगायच समान्यांनी असा सवाल नंदू परब यांनी केला.

भाजपाचे हे केवळ एक आंदोलन नसून याआधीही जनआक्रोश आंदोलन, वाढीव बिलांची होळी आदींच्या माध्यमाने नाराजी, घोषणाबाजी करण्यात आली पण तरीही सरकारला जाग आलेली नाही असे हे निष्क्रिय सरकार असल्याने जनतेच्या काही कामाचे नाही अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली. वीजबिल कमी व्हायलाच हवे, शासनाकडे दाद मागायची नाही तर कोणाकडे मागायची असा सवाल मोरे यांनी केला. 

दरम्यान, कल्याणमध्ये आमदार गायकवाड, मोरे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्याना पोलिसांनी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नसल्याने विरोध केला, त्यावर भले गुन्हे दाखल करा पण रविवारी पत्रिपूल गर्डर टाकताना सोशल डिस्टंन्सिंग पाळलं गेलं का? असा नामोल्लेख न करता सवाल करत तिथले गुन्हे दाखल करणार का? असा सवाल केला. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, महिला आघाडीच्या मनीषा राणे, युवा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई आदी. आठ दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन तोडगा काढणार असे बिक्कड म्हणाले आहेत. 

कल्याणमध्ये भाजपाच्या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी महावितरण कार्यालयाबाहेर रोखल्यानंतर निषेध करता येत नाही, असे हे दादागिरी, दंडुकेशाही करणारे सरकार असून त्या सरकारकडून काय अपेक्षा करायच्या, अन्य राज्यांनी 50 टक्के बिल कमी केली, जनतेला दिलासा दिला पण इथं मात्र तस होत नाही हे राज्य सरकारचे अपयश असून शिवसेना बाळासाहेब प्रमुखांचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे जरी स्वप्न पूर्ण झाले असले तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर ते योग्य नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :BJPभाजपाdombivaliडोंबिवलीelectricityवीज