शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही!

By पंकज पाटील | Updated: November 25, 2023 08:51 IST

अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात. 

पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर पालिकेने शहरात तीन वर्षांत ४५० नव्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली. आणखी २०० इमारतींच्या बांधकामांचा प्रस्ताव आहे. मात्र, खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर एक थेंब पाणी देणार नाही, असा इशाराच नगरपालिका प्रशासनाला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. प्राधिकरणाची भूमिका शहराच्या विकासात बाधा आणणारी असल्याचे नगरपालिकेचे मत आहे, तर सर्व सोंगे आणता येतील पण पाण्याचे सोंग कुठून आणायचे? असा सवाल प्राधिकरणाचे अधिकारी करीत आहेत.

शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यात प्राधिकरण अपयशी ठरत असून नव्या इमारती उभारताना पालिकेने पाण्याची उपलब्धता तपासावी, असा अलिखित फतवा काढला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव पाणी उपलब्ध होत नसल्याने जीवन प्राधिकरण हतबल झाले आहे. बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभारणीला नगरपालिका परवानगी देत आहे. मात्र या संकुलात वास्तव्याला येणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात. 

बदलापूर, अंबरनाथला१६ दशलक्ष लिटर्सची तूटn महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना दररोज १४६ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. n अंबरनाथसाठी ७६, तर बदलापूरसाठी ७० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. n लोकसंख्येच्या तुलनेत अंबरनाथला ८९, तर बदलापूरला ७४ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. त्यामुळे तब्बल १६ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट असल्यामुळेच दोन्ही शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जीवन प्राधिकरणामार्फत एमआयडीसीचे मार्केटिंग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वाढत्या शहराला पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र ते पाणीपुरवठा करू शकत नसल्यामुळे आता प्राधिकरणाचे अधिकारीच आपल्या ग्राहकांना थेट एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा सल्ला देत आहेत.

अशी चलाखीअनेक इमारतींना एमआयडीसीचे पाणी बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये नव्याने विकसित होणाऱ्या अनेक गृहप्रकल्पांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन थेट एमआयडीसीकडे वाढीव पैसे भरून एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.

जलदगतीने विकास होणाऱ्या शहरांच्या यादीत बदलापूर असल्यामुळे या ठिकाणी गृहसंकुलांची परवानगी रोखता येणार नाही. प्राधिकरणाने पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यातच अनेक विकासक आता स्वतःहून एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाण्याची अनुपलब्धता हे कारण विकासाला बाधा ठरू नये एवढीच अपेक्षा आहे.- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, बदलापूर

बदलापूर शहराला पाच एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. वाढीव पाणी मिळत नसल्यामुळे समस्या झाली आहे. नवीन इमारतींना केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य होते. इतर वापरासाठी पाणी देणे भविष्यात अवघड जाईल. पालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी एकत्रितपणे ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.- माधुरी पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूरthaneठाणे