शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांविरोधात बॅनरबाजी; कल्याण बदलापूर रस्त्याचं काम संथगतीने केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 8:19 PM

सगळ्याची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्याचा दौरा ऐनवेळी दौरा रद्द केला

अंबरनाथ: अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रस्त्याचे काम संथगतीने चालल्याचा आरोप करत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मागील ५ वर्षांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून याला आमदारांचा निष्क्रिय कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.           

राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या कल्याण बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण एमएमआरडीए कडून केले जात आहे. गेल्या ५ वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून हे काम सुरू असून अजूनही ते पूर्ण झालेले नाही. सध्या रेशनिंग ऑफिस ते मोरीवली नाक्यापर्यंतच्या पट्ट्यात हे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू असून यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मेटलनगर भागातील रिक्षाचालक लल्लन यादव हे जखमी झाले. यादव यांचा पाय या अपघातात फ्रॅक्चर झाला असून त्यामुळे त्यांच्यावर सध्या घरी बसण्याची वेळ आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर हे अधिकाऱ्यांसह या रस्त्याची पाहणी करणार होते. मात्र त्यापूर्वीच स्थानिकांनी ठिकठिकाणी आमदारांच्या निषेधाचे बॅनर लावत त्यांना काळे झेंडे दाखवायची तयारी केली. आमदारांच्या दौऱ्याची वेळ होताच आमदारांविरोधात घोषणाबाजीही सुरू करण्यात आली.

काँग्रेस आणि स्वाभिमान संघटनेनेही यावेळी स्थानिकांना पाठींबा दिला. या सगळ्याची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्याचा दौरा ऐनवेळी दौरा रद्द केला. तसेच एमएमआरडीए, अंबरनाथ नगरपालिका, महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात बोलावली. बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे कुणालाही न कळवता अचानक तिथे दाखल झाल्याने अनेकांना घाम फुटला. यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसात सर्व अडथळे पूर्ण करत कामाला गती देण्याचे आश्वासन आमदार बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना दिले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना बॅनरबाजीबाबत विचारले असता रस्त्याला दिरंगाई झाल्याचे त्यांनी मान्य केले, तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ambernathअंबरनाथkalyanकल्याण