शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केडीएमटीच्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था, मनसे पदाधिकाऱ्याने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 17:57 IST

परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिहवन उपक्रमांतर्गत वसंत व्हॅली येथे 2015 साली सुरु करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था झाली आहे. याकडे मनसे माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी लक्ष वेधले आहे. 

परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या. या एसी बसेस वसंत व्हॅली आगारात ठेवण्याची सोय होती. त्या ठिकाणाहून नवी मुंबईला या बसेस सोडण्यात येत होत्या. आज त्याठिकाणी परिवहनच्या अन्य बसेस उभ्या आहेत. पावसामुळे त्याठिकाणी गवत आणि अन्य झुडपे उगवली आहेत. त्यात हे आगार झाकले गेले आहे. 

आगाराला प्रवेश द्वार नाही. त्याठिकाणी बस उभ्या आहे. आगाराची पूर्णपणो दुरावस्था झाली आहे. महापालिकेने त्याठिकाणी अन्य भंगार वाहने ठेवली आहे. आगार हे भंगार वाहने ठेवण्यासाठी आहे की, बसेस चालविण्यासाठी, असा सवाल उपस्थित करीत या विषयीची पोस्ट शेख यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तरीही बाळासाहेब ठाकरे परिवहन आगाराची दुरावस्था  होते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याकडे शेख यांनी लक्ष वेधले आहे. परिवहन व्यवस्थापन आणि सत्ताधा:यांच्या अनास्थेविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी मौन बाळगले आहे. 

दरम्यान शिवसेनेचे उप शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, शेख यांच्या फेसबूक पोस्टची शिवसेनेने गंभीर दखल घेत प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता कोविड काळात आगाराकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र येत्या 8 दिवसात आगाराच्या ठिकाणी वाढलेले गवत आणि झुडपे काढली जातील. तसेच भंगार वाहने ही हटविली जातील. 

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसे