शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रस्त्यावर खड्डे पडल्याने अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची; सामाजिक संस्थेची उपरोधिक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:15 IST

कल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डेचा रस्ता खड्ड्यात.

ठळक मुद्देकल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डेचा रस्ता खड्ड्यात

कल्याण-कल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. कंबरतोड प्रवास करीत नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणा:या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

कल्याण विकासिनी या सामजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. उदय रसाळ यांनी या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. तसेच मणक्याचे आजार त्यांना होऊ लागले आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहता खड्डे बुजवले जात नसल्याने खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरीकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. दिवाळीत बोनस घेऊन आणि सातव्या वेतनाप्रमाणे पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरीकांच्या उपचाराकरीता मिळावे. ज्या तत्परते महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले. ते काम पूर्ण करण्यात प्रशासनाने तत्परता दाखविली नाही. काम कासव गतीने सुरु आहे असे म्हटल्यास कासव गती तरी गतीशील असेल पण कामाची गती त्यापेक्षा कमी आहे. कामाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारत रत्न देऊन गौरव केला तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा गौरव हा कमीच पडेल, असे प्रश्न विकासिनीच्या माध्यमातून रसाळ यांनी उपस्थित केले आहेत.

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आत्ता नवरात्री उत्सव आहे. त्यानंतर दिवाळी आहे. दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्रटदाराच्या खिशात घातला जातो का असा प्रश्न दरवर्षी उपस्थित केला जातो. अधिकारी, कंत्रटदार यांच्या साटेलोटे यांच्या पुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का असे म्हणत त्यांनी कानउघणीही केली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस