शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर खड्डे पडल्याने अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची; सामाजिक संस्थेची उपरोधिक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:15 IST

कल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डेचा रस्ता खड्ड्यात.

ठळक मुद्देकल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डेचा रस्ता खड्ड्यात

कल्याण-कल्याण पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. कंबरतोड प्रवास करीत नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणा:या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

कल्याण विकासिनी या सामजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. उदय रसाळ यांनी या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. तसेच मणक्याचे आजार त्यांना होऊ लागले आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहता खड्डे बुजवले जात नसल्याने खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरीकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. दिवाळीत बोनस घेऊन आणि सातव्या वेतनाप्रमाणे पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरीकांच्या उपचाराकरीता मिळावे. ज्या तत्परते महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले. ते काम पूर्ण करण्यात प्रशासनाने तत्परता दाखविली नाही. काम कासव गतीने सुरु आहे असे म्हटल्यास कासव गती तरी गतीशील असेल पण कामाची गती त्यापेक्षा कमी आहे. कामाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारत रत्न देऊन गौरव केला तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा गौरव हा कमीच पडेल, असे प्रश्न विकासिनीच्या माध्यमातून रसाळ यांनी उपस्थित केले आहेत.

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आत्ता नवरात्री उत्सव आहे. त्यानंतर दिवाळी आहे. दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्रटदाराच्या खिशात घातला जातो का असा प्रश्न दरवर्षी उपस्थित केला जातो. अधिकारी, कंत्रटदार यांच्या साटेलोटे यांच्या पुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का असे म्हणत त्यांनी कानउघणीही केली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस