शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

By अनिकेत घमंडी | Updated: February 24, 2024 15:53 IST

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद

डोंबिवली: महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू ती योग्य नाही. महायुतीत जाण्याच्या वावड्या, चर्चांवरही भाष्य करताना ते म्हणाले।की, स्पष्टच सांगतो, या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा युती ठरत नसतात, असं म्हणत महायुतीत समावेश होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरेंनी पडदा टाकला. त्यांनी सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली.

ते म्हणालेकी, विधानभवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर करतोय असेच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार असल्याची टीका त्यांनी केलीय.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी ते  डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली.

मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे ते पाहून तरुण वर्ग राजकारण येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही असे सांगितले. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलतांना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी केला. 

ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले त्यावरून त्यांनी पवारांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले महापुरुष जातीपाती मध्ये विभागून टाकलेत , आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचे ठाकरे म्हणालेत. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईलच असेही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळण्याबाबतचे मागणे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. त्यासाठी राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत,तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगून वर्षांनुवर्षं तेच सांगत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवली