शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

By अनिकेत घमंडी | Updated: February 24, 2024 15:53 IST

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद

डोंबिवली: महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू ती योग्य नाही. महायुतीत जाण्याच्या वावड्या, चर्चांवरही भाष्य करताना ते म्हणाले।की, स्पष्टच सांगतो, या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा युती ठरत नसतात, असं म्हणत महायुतीत समावेश होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरेंनी पडदा टाकला. त्यांनी सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली.

ते म्हणालेकी, विधानभवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर करतोय असेच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार असल्याची टीका त्यांनी केलीय.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी ते  डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली.

मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे ते पाहून तरुण वर्ग राजकारण येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही असे सांगितले. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलतांना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी केला. 

ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले त्यावरून त्यांनी पवारांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले महापुरुष जातीपाती मध्ये विभागून टाकलेत , आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचे ठाकरे म्हणालेत. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईलच असेही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळण्याबाबतचे मागणे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. त्यासाठी राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत,तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगून वर्षांनुवर्षं तेच सांगत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवली