शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पोटाची खळगी भरण्यासाठी 'त्यांना' करावी लागते जीवघेणी कसरत; PHOTO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:51 IST

आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.

कल्याण- एकीकडे आपण स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा करत आहोत. इतकंच नाही तर लवकरच आपण 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. एकीकडे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या शहरांत मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. मात्र या शहरांपासून जवळच असलेल्या कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी गावातील नागरिक आजही मरण यातना भोगत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास पाहून तुमच्याही अंगवार शहारा येईल. 

लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला या नदीवरून टाकण्यात  आलेल्या लोखंडी खांबावरून  पायी चालतात. थोडा जरी तोल चुकला तरी थेट उल्हास नदीत पडून वाहून जाण्याची भिती या गावकऱ्यांना असते. मात्र ही टांगती तलवार असतानाही नाईलाजाने हा प्रवास  ग्रामस्थांना करावाच लागतो. 

आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा या गावात पहिले शेती केली जायची मात्र त्यानंतर आजूबाजूला एमआयडीसी झाल्याने रोजगारासाठी ग्रामस्थ बाहेर पडू लागले. 

वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मीटर रुंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट तयार करून देण्यात आली होती. ये जा करण्यासाठी ग्रामस्थ हा रस्ता वापरत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात पायवाटेचा काही भाग  वाहून गेला. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना उल्हास नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.दुस-या मार्गाने जायचे असेल तर 20 ते 25 किलोमीटर लांबून वळसा मारावा लागतो. एकीकडे उपासमार टाळण्यासाठी हा भयंकर प्रवास  करावा लागतो तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने 25 किमी लांबच्या पल्ल्याहून प्रवास करणे परवडेनासे झाले आहे.यामुळे आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेriverनदी