शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या शेजारी आकाराला येतेय १२ लाख लोकसंख्येची दुसरी डोंबिवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 05:44 IST

कोटीचा फ्लॅट घेणारे लक्षावधी समस्यांनी त्रस्त; गाजर दाखविले, म्हणून घरे घेतली, आता फक्त पश्चात्ताप

मुरलीधर भवार

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावर एकेकाळी कच्ची-पक्की बैठी घरे होती. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी लुटमारीच्या भीतीने घाबरायचे. गेल्या काही वर्षांत या रस्त्यालगतच्या भूखंडांवर किमान पाच ते सहा बिल्डरांचे टाऊनशिप प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केले आहेत.

येत्या दोन वर्षांत किमान एक ते दीड लाख फ्लॅटमध्ये किमान सहा ते सात लाख लोक राहायला येतील. त्यांना पाणी, वाहतूक, रस्ते, सुरक्षा अशा कोणत्याही सुविधेचे नियोजन एमएमआरडीएने केलेले नाही. महापालिकेने आपला संबंध नाही असे म्हणत हात वर केले आहेत.मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे मार्गाचा दुवा ठरणारा भिवंडी-कल्याण-शीळ रस्ता सहा पदरी काँक्रिटीकरणाचा झाला आहे. याच भागात कल्याण, तळोजा आणि ठाणे-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प येणार असे गाजर दाखवून बिल्डरांनी घरे विकली. मात्र महागडी घरे घेणे लोकांना महागात पडले आहे.

नागरिकांवर कराचा बोजा कशाला? इंटिग्रेटेड टाऊनशिप अंतर्गत बड्या बिल्डरांना बांधकाम परवानगी दिल्यावर गृह संकुलाच्या कार्यक्षेत्रात पायाभूत सोयी सुविधा त्यांनीच उभारायच्या आहेत. त्यामुळे घर घेणाऱ्यांना मालमत्ता कर कमी आकारला गेला पाहिजे. महापालिकेने या घरातील नागरिकांकडून ६६ टक्के अतिरिक्त कर वसूल केला आहे. त्याची रक्कम २५ कोटींच्या आसपास आहे. तो कमी करण्याची मागणी असताना त्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. स्टेशनपासून परिसर दूर असल्याने रिक्षा चालक या परिसरात रिक्षा घेऊन येण्याकरिता रात्री-अपरात्री तोंडाला येईल ते भाडे सांगतात.

बड्या टाऊनशिपला एमएमआरडीने परवानगी दिल्या आहेत. त्या बड्या प्रकल्पातील घनकचरा व्यवस्थापन त्यांनी करायचे आहे. ते होत नसल्यास कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पाणीपुरवठा एमआयडीसी करते. वितरण महापालिका करते. मालमत्ता कराच्या फेरमूल्यांसाठी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल येताच निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या मागणीनुसार बससेवा सुरू केली जाईल. - डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका

राज्य शासनाला महसूल मिळतो, म्हणून एमएमआरडीएने बड्या बिल्डरांना मनमानी परवानग्या दिल्या. नव्या प्रकल्पात घर घेणाऱ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. पलावा उड्डाणपूल, पाणीटंचाई, जास्तीचा मालमत्ता कर, वाहतूक कोंडी या सगळ्या मुद्द्यावर राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. ज्या प्रमाणात पाणी कोटा मंजूर आहे, तो मिळत नाही. मोरबे धरणाच्या बदल्यात १४० दशलक्ष लीटर पाण्याचा कोटा या भागाकडे वळविल्यास पाण्याची समस्या उद्भवणार नाही. - राजू पाटील, मनसे आमदार, कल्याण ग्रामीण

रिक्षा चालकांना वेसण घालण्याची गरजकेडीएमटीने डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशनमधून रिजेन्सीपर्यंत आणि रिजेन्सी ते वाशी नवी मुंबई विशेष बससेवा सुरू करावी. रेल्वे स्थानकातून रिजेन्सी, रुणवाल प्रकल्पाकडे रिक्षाने येण्यासाठी १०० ते १२५ रुपये भाडे आकारले जाते. रात्रीच्या वेळी १५० ते १७५ रुपये भाडे घेतले जाते. मीटरवर रिक्षा सुरू करण्याची आणि रिक्षाचालकांच्या मनमानीला आरटीओने वेसण घालण्याची गरज आहे.

मे महिन्यात आम्हाला पाणी टंचाईची समस्या जाणवली. बिल्डरने पाण्याची व्यवस्था केली आहे, तसेच संकुलात देऊ केलेल्या सोई-सुविधा आहेत, पण भविष्यात सर्व रहिवासी वास्तव्याला आल्यावर समस्या बिकट होतील. - लता अरगडे, रिजेन्सी अनंत प्रकल्पातील रहिवासी

वाहतूक कोंडीचे स्पॉट झाले तयारपलावा सर्कल येथे वाहतूक कोंडी होते. तोडगा म्हणून पलावा उड्डाणपुलाचे सुरू केलेले काम संथगतीने सुरू आहे. रिजेन्सी प्रकल्पातून बाहेर पडताच कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. रुणवालच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा लागणार आहे.

प्रकल्पाचा अर्धा भाग ठाणे महापालिका हद्दीत आहे. जेवढी घरे बांधली तेवढा पाण्याचा कोटा घेतला नव्हता. स्टेशनपासून २० मिनिटांचा अंतरावर घरे आहेत, अशी जाहिरात केली. रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडीमुळे घरी जाण्यास तासभर लागतो. - रंजित काकडे, रुणवाल प्रकल्पातील रहिवासी

पाणी समस्येला आम्ही जबाबदार नाहीनव्या प्रकल्पांना  पाणीपुरवठा करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. त्यांनी कमी दाबाने पाणी दिले की, पाणी समस्या उद्भवते. याचा महापालिकेशी काही संबंध नाही. - किरण वाघमारे,  उपअभियंता, पाणीपुरवठा, महापालिका