शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य आंदोलन करणा-यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:31 IST

उल्हास नदी पात्रात होत असलेल्या प्रदूषण रोखणो व जलपर्णी काढणो या दोन प्रश्नावर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदी पात्रत आंदोलन केले.

कल्याण - उल्हास नदी पात्रात होत असलेल्या प्रदूषण रोखणो व जलपर्णी काढणो या दोन प्रश्नावर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदी पात्रत आंदोलन केले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनंतर आंदोलन २७ फेब्रुवारी रोजी मागे घेतले गेले. मात्र आंदोलन मागे घेताना प्रशासनाकडून दिले गेलेले आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य आहे याकडे आंदोलन करणारे नितीन निकम यांनी लक्ष वेधले आाहे.उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे वतीने निकम यांच्यासह कैलास शिंदे व उमेश बोरगावकर यांनी आंदोलन केले होते. १८ दिवसानंतर पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी भेट दिली. या भेटीच्या वेळी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी ही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी तातडीने जलपर्णी काढण्यासाठी मशीन मागविण्यात यावे. त्याची निविदा काढावी असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान मशीन येई र्पयत मॅन्यूअली जलपर्णी काढण्यात यावी असे सूचित केले होते. मॅन्यूअली जलपर्णी काढली जात असली तरी मॅन्यूअली जलपर्णी काढणे इतके सोपे नाही. जलपर्णी मशीन द्वारे काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. मात्र मशीन तयार नसते. ती तयार करण्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात जून महिन्या उजाडणार असेल तर तोर्पयत पावसाळा येणार. त्यामुळे मशीन मागविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मशीनची किंमत ३ कोटीच्या घरात आहे. तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर मिठी नदीच्या ठिकाणाहून मशीन मागविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मशीन मागवून जलपर्णी काढण्याचे आश्वासानाची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चंद्रशेखर भडसावले या पर्यावर तज्ञांच्या मदतीने हर्बल फवारणी करुन जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जावा. त्यासाठी निकम यांनी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भडसावले यांच्या मदत घेण्याच्या कामाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर नाव्रेकर यांनी नदीचे पाणी लाखो लोक पितात. हर्बल फवारणीने काही दुसरीच रिअॅक्शन झाल्यास त्याला जबाबदार कोण. त्याची शहानिशा केल्याशिवाय हा प्रयोग करता येणार नाही असे मत व्यक्त केले. त्यामुळे मशीन द्वारे जलपर्णी काढणे व हर्बल फवारणी करुन समूळ नष्ट करणे ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेली नाही. आंदोलन मागे घेऊन 16 दिवस उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मग आंदोलन मागे घेण्याचा आग्रह का धरण्यात आला असा प्रतिप्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे.  पालकमंत्र्यांच्या आश्वासना पश्चात आंदोलन मागे घेतले होते. पालकमंत्र्यांचीच भेट घेऊन निकम हा सगळा प्रकार त्यांना सांगणार आहेत. 

टॅग्स :kalyanकल्याण