शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

By मुरलीधर भवार | Published: December 21, 2023 4:01 PM

१९ व्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

डोंबिवली : आगरी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात यंदा गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. महोत्सवाच्या आठ दिवसांच्या काळात तब्बल चार लाखांहून अधिक नागरिकांनी आगरी संस्कृती अनुभवली. महोत्सवाची बुधवारी सांगता करताना संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानले. यापुढील काळात संत सावळाराम महाराजांच्या भव्य स्मारकासह समाजासाठी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा अध्यक्ष गुलाब वझे यांनी केली.

मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम २००४ मध्ये डोंबिवली येथे आगरी महोत्सव सुरू झाला होता. यंदा महोत्सवाचे १९ वे वर्ष होते. त्यानिमित्ताने नागरिकांसाठी आगरी खाद्य संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच सामाजिक भान राखून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. १३ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवाचा काल रात्री समारोप करण्यात आला. त्यावेळी गुलाब वझे यांच्यासह मंचावर विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दिलीप देसले, संतोष संत, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, नारायण म्हात्रे, कांता पाटील, अनंत पाटील, विनायक पाटील, अशोक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील, सल्लागार विजय पाटील, राम पाटील, प्रभाकर चौधरी, गंगाराम शेलार, सुभाष चं. म्हात्रे, चंद्रकांत पाटील, डॉ. दिनेश म्हात्रे, सुरेश जोशी, नंदू म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया नायकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या महोत्सवात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, पनवेल येथील समाजाचे नेते बबन पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदींसह मान्यवर नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका आदींनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात नागरिकांनी खाद्य व मनोरंजनाबरोबरच विविध विषयांवरील चर्चाही ऐकली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे, मराठी भाषेचे संवर्धन व जतन, ओबीसी आरक्षण आदी विषयांवरील कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या महोत्सवाच्या यशाबद्दल अध्यक्ष गुलाब वझे यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनीही महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.

संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी सर्वोच्च प्राधान्य

संत सावळाराम महाराज यांचे नेतिवली येथे दहा एकरात भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्याचबरोबर २७ गावांमधील वाढत्या करांना माफी, शीळफाटा रस्त्याला संत सावळाराम महाराजांचे नाव, आगरी युथ फोरमच्या महाविद्यालयाला जागा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली