शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

२७ गावातील जागेचा एक गुंठ्याला ५० लाख भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2023 17:59 IST

एका गुंठ्याला ५० लाख रुपयांचा भाव दिला जावा अशी मागणी शेतकरी आणि भूमीपूत्रांची आहे.

कल्याण - कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील जमीनाचा भाव रेडी रेकनर नुसार एका गुंठयाला ९ लाख ८० हजार रुपये दिला जात आहे. मात्र हा दर शेतकरी आणि भूमीपूत्रांना मान्य नाही. एका गुंठ्याला ५० लाख रुपयांचा भाव दिला जावा अशी मागणी शेतकरी आणि भूमीपूत्रांची आहे.२७ गावातील भूमीपूत्र विक्रम पाटील यांनी सांगितले की, २७ गावात डेडीकेट फ्रेट कॉरिडॉर हा रेल्वेचा दिल्ली ते जेएनपीटी मालवाहतूक गाड्यांचा विशेष प्रकल्प आहे.या प्रकल्पात २७ गावातील शेतकरी वर्गाच्या जमीनी बाधित झालेल्या आहे. याशिवाय विरार अलिबाग कॉरिडोर प्रकल्प आहे. त्याचबरोबर २७ गावातील १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. या ठिकाणी चार रस्ते विकासीत केले जात आहे. त्याच्या जागेचे हस्तांतर कल्याण प्रांत कार्यालकडून एमएमआरडीएला करण्यात आले आहे.

या विविध प्रकल्पात बाधितांच्या जामीनी बाधित होत आहे. त्यांना सरकारने जाहिर केलेल्या रेडी रेकनर नुसार एका गुंठ्याला ९ लाख ८० हजार रुपयांचा दर निश्चीत केला आहे. या दरानुसार अडीच पट मोबदला दिला जात आहे. अडीच पटानुसार २१ ते २२ लाख रुपये एका गुंठ्याला शेतकरी आणि भूमीपूत्राला मिळू शकतात. मात्र २७ पैकी १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर आहे. याठिकाणी बड्या गृहसंकुलाचे प्रकल्प सध्या सुरु आहे. या प्रकल्पात सदनिकेेची किंमत ३० ते ३५ लाख रुपये आहे. ही किंमत किमान किंमत आहे. भविष्यात हा दर वाढणार आहे. मग अडीचपट मोबदल्यानुसार २१ ते २२ लाख रुपये भूमीपूत्र आणि शेतकऱ्यांनी का घ्यायचे. २७ गावांपैकी १८ गावे वगळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका न्याय प्रविष्ट आहे.

राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या गावे महापालिकेत आहेत. जर हा मुद्दा ग्राह्य धरला नाही तर ही गावे ग्रामीणमध्ये आहेत. ग्रामीणमध्ये २७ गावे ग्राह्य धरल्यास रेडीरेकनर दरानुसार ९ लाख ८० हजार प्रति गुंठ्यानुसार पाच पट मोबदला दिला गेला पाहिजे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या मागणीचा राज्य सरकारने विचार करावा अशी पाटील यांची मागणी आहे.

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी