शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कायद्याने वागा लोकचळवळीचा २०२३ चा फातिमाबी-सावित्री पुरस्कार घोषित

By मुरलीधर भवार | Updated: January 20, 2023 15:26 IST

पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

कल्याण : विविध क्षेत्रात उल्लेखीनय कामगिरी करणाऱ्या महिलांना कायद्याने वागा लोकचळवळीतर्फे पुरस्कार फातिमाबी-सावित्री पुरस्कार दिला जातो. दोन्ही वर्षातील पुरस्कार घोषित झाले आहेत. पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

उल्हासनगर मनपा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पत्रकार किरण सोनवणे, गंगोत्री फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनिया धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या फातिमाबी - सावित्री उत्सवाचं स्वागताध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ता अॅड. उदय रसाळ यांच्याकडे आहे. इंटरसेक्स लिंग समानता तसंच एलजीबीटीक्यूआयए समुहांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत डॅनिएल्ला मेंडोंसा, ट्रेनमध्ये भीक मागता मागता त्याच पैशांची बचत करून कॅमेरा विकत घेऊन भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट होण्याचा मान पटकावलेली झोया लोबो, रहनुमां संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कम्युनिटी लायब्ररी चालवणारी सादिया शेख, कॅन्सरसारख्या आजाराला मात देत जिद्दीने शिकत आपल्या स्वप्नांकडे झेपावणारी रिया भूतकर आणि तालवाद्यांवरील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढीत आपला स्वतंत्र ठसा उमटवलेली ढोलकपटू निशा मोकल यंदाच्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी- सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

गेल्यावर्षी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. नावं घोषित होऊनही पुरस्कार वितरण होऊ शकलेलं नव्हतं. बँकेतून निवृत्त झाल्यावर कोकणातील ग्रामीण भागात स्थायिक होऊन निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सामाजिक कार्यावर खर्च करून महिला रोजगार निमिर्तीसाठी धडपडणाऱ्या रत्नागिरीतील देवरुखच्या रुबिना चव्हाण, बीड जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीत दारुबंदी, बालविवाह प्रतिबंध विषयांवर तसंच कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कार्यरत माजलगावच्या सत्यभामा सौंदरमल, २५ वर्षांपूर्वी कौमार्य चाचणी विरोधात उभं ठाकून सामाजिक बहिष्काराचा धैर्याने सामना करणाऱ्या मुंबईतील अरुणा इंद्रेकर, मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पुण्याच्या कल्पना दुधाळ आणि उच्च शिक्षण असतानाही आपल्या गावच्या आधुनिक विकासासाठी राजकारणात उतरलेल्या रत्नागिरीतील कशेळी गावच्या सरपंच सोनाली मे स्त्री २०२२ च्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी-सावित्री पुरस्काराच्या मानकरी आहेत. दोन्ही वर्षांचे मिळून यंदाच्या कार्यक्रमात एकूण १० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फातिमाबी सावित्री उत्सवाचे समन्वयक वृषाली विनायक व राकेश पद्माकर मीना यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याण