शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

कायद्याने वागा लोकचळवळीचा २०२३ चा फातिमाबी-सावित्री पुरस्कार घोषित

By मुरलीधर भवार | Updated: January 20, 2023 15:26 IST

पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

कल्याण : विविध क्षेत्रात उल्लेखीनय कामगिरी करणाऱ्या महिलांना कायद्याने वागा लोकचळवळीतर्फे पुरस्कार फातिमाबी-सावित्री पुरस्कार दिला जातो. दोन्ही वर्षातील पुरस्कार घोषित झाले आहेत. पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

उल्हासनगर मनपा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पत्रकार किरण सोनवणे, गंगोत्री फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनिया धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या फातिमाबी - सावित्री उत्सवाचं स्वागताध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ता अॅड. उदय रसाळ यांच्याकडे आहे. इंटरसेक्स लिंग समानता तसंच एलजीबीटीक्यूआयए समुहांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत डॅनिएल्ला मेंडोंसा, ट्रेनमध्ये भीक मागता मागता त्याच पैशांची बचत करून कॅमेरा विकत घेऊन भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट होण्याचा मान पटकावलेली झोया लोबो, रहनुमां संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कम्युनिटी लायब्ररी चालवणारी सादिया शेख, कॅन्सरसारख्या आजाराला मात देत जिद्दीने शिकत आपल्या स्वप्नांकडे झेपावणारी रिया भूतकर आणि तालवाद्यांवरील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढीत आपला स्वतंत्र ठसा उमटवलेली ढोलकपटू निशा मोकल यंदाच्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी- सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

गेल्यावर्षी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. नावं घोषित होऊनही पुरस्कार वितरण होऊ शकलेलं नव्हतं. बँकेतून निवृत्त झाल्यावर कोकणातील ग्रामीण भागात स्थायिक होऊन निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सामाजिक कार्यावर खर्च करून महिला रोजगार निमिर्तीसाठी धडपडणाऱ्या रत्नागिरीतील देवरुखच्या रुबिना चव्हाण, बीड जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीत दारुबंदी, बालविवाह प्रतिबंध विषयांवर तसंच कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कार्यरत माजलगावच्या सत्यभामा सौंदरमल, २५ वर्षांपूर्वी कौमार्य चाचणी विरोधात उभं ठाकून सामाजिक बहिष्काराचा धैर्याने सामना करणाऱ्या मुंबईतील अरुणा इंद्रेकर, मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पुण्याच्या कल्पना दुधाळ आणि उच्च शिक्षण असतानाही आपल्या गावच्या आधुनिक विकासासाठी राजकारणात उतरलेल्या रत्नागिरीतील कशेळी गावच्या सरपंच सोनाली मे स्त्री २०२२ च्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी-सावित्री पुरस्काराच्या मानकरी आहेत. दोन्ही वर्षांचे मिळून यंदाच्या कार्यक्रमात एकूण १० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फातिमाबी सावित्री उत्सवाचे समन्वयक वृषाली विनायक व राकेश पद्माकर मीना यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याण