शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

'ती' 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जाणार; पालकमंत्र्यांचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 01:29 IST

ही 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेली 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. 

विधानसभेचे अधिवेशन आटोपून आमदार पाटील हे त्यांच्या पलावा येथील कार्यालयात परतले. तेव्हा त्याठिकाणी 14 गावे सर्व पक्षी संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. पाटील यांचे आगमन होताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह पालकमंत्र्यांचे आभार मानले. आमदार पाटील यांनी सांगितले की,  कोविडमुळे अधिवेशन होत नव्हते. काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आज 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची लक्षवेधी मांडली. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातील, असा दुजोरा  पालकमंत्री शिंदे यांनी दिला आहे. हा लढा त्याठिकाणच्या संघर्ष समितीचा आहे. याचे सर्व श्रेय त्या गावातील एकजूटीला देत असल्याचे मान्य करीत आमदार पाटील यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले आहेत.यावेळी संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, आमच्या 14 गावांत पाच ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीमुळे पाहिजे तसा गावांचा विकास होत नव्हता. गेल्या तीन निवडणूकांवर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमची गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी आमची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी उचलून धरली. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पालकमंत्री शिंदे यांनी गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येतील असे मान्य केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेNavi Mumbaiनवी मुंबईkalyanकल्याण