शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास अन् वालधूनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी  1208 कोटी 47 लाखाचा निधी मंजूर करा; श्रीकांत शिंदे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:17 IST

उल्हास नदी ही राजमाची डोंगरातून उगम पावते. तिच्या पाण्यावर 50 लाख पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. ही नदी प्रदूषित  होत आहे.

कल्याण- उल्हास आणि वालधूनी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 1208 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्रलयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे. उल्हास नदी ही राजमाची डोंगरातून उगम पावते. तिच्या पाण्यावर 50 लाख पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. ही नदी प्रदूषित  होत आहे.  त्याचबरोबर मलंग गडाच्या पायथ्यापासून उगम पावणारी प्राचीन नदी वालधूनी ही नागरीकरणामुळे सगळ्यात जास्त प्रदूषित झाली आहे. तिचे पाणी पिण्यायोग्य नाही. या दोन्ही नद्यांच्या पाण्यात होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आराखडा पाठविण्यात आला आहे. उल्हास नदी प्रदूषणासाठी 211 कोटी 34 लाख रुपये आणि वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 997 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा. नमामी गंगेच्या धर्तीवर या दोन्ही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने मंजूरी द्यावी.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील 21 नद्यांचे मिशन फॉर क्लीन रिव्हर इन महाराष्ट्रा या मोहिमे अंतर्गत नदी प्रदूषण रोखण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे. त्याचा अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला पाठविला आहे. त्यात अपेक्षित निधी किती आवश्यक आहे. त्यानुसार निधीची मागणी केली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे. भविष्यात नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था या सारख्या त्रयस्थ संस्थेकडून कामाचे लेखा परिक्षण करण्यात यावे. जेणे करुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान या सारख्या संस्थांना अहवाल सादर करतील.

वालधूनी नदी नागरीककरण आणि आजूबाजूच्या वस्तीतून सोडल्या जाणा:या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. टाकाऊ वस्तू नदीत टाकल्या जातात. काही कंपन्या रसायन मिश्रित सांडपाणी नदी पात्रत सोडतात. नदीतील पाणी आणि नदीखालील भूस्तर प्रदूषित झाला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात प्रदूषित  वालधूनी नदी आहे.  त्याच प्रमाणो बारमाही वाहणारी उल्हास नदीही प्रदूषित होत आहे. जी सगळ्य़ात मोठा जलस्त्रोत आहे. तिचे प्रदूषण रोखणो हा कळीचा मुद्दा आहे. या दोन्ही नद्यांचे होणारे प्रदूषण रोखून त्यांचे शुद्धीकरण करणो गरजेचे असल्याकडे खासदार शिंदे यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे. लोकसभेच्या मागच्या अधिवेशनातही खासदारांनी नदी प्रदूषण रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण