शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

उल्हास अन् वालधूनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी  1208 कोटी 47 लाखाचा निधी मंजूर करा; श्रीकांत शिंदे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:17 IST

उल्हास नदी ही राजमाची डोंगरातून उगम पावते. तिच्या पाण्यावर 50 लाख पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. ही नदी प्रदूषित  होत आहे.

कल्याण- उल्हास आणि वालधूनी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 1208 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्रलयाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे. उल्हास नदी ही राजमाची डोंगरातून उगम पावते. तिच्या पाण्यावर 50 लाख पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. ही नदी प्रदूषित  होत आहे.  त्याचबरोबर मलंग गडाच्या पायथ्यापासून उगम पावणारी प्राचीन नदी वालधूनी ही नागरीकरणामुळे सगळ्यात जास्त प्रदूषित झाली आहे. तिचे पाणी पिण्यायोग्य नाही. या दोन्ही नद्यांच्या पाण्यात होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आराखडा पाठविण्यात आला आहे. उल्हास नदी प्रदूषणासाठी 211 कोटी 34 लाख रुपये आणि वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 997 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा. नमामी गंगेच्या धर्तीवर या दोन्ही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने मंजूरी द्यावी.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील 21 नद्यांचे मिशन फॉर क्लीन रिव्हर इन महाराष्ट्रा या मोहिमे अंतर्गत नदी प्रदूषण रोखण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे. त्याचा अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला पाठविला आहे. त्यात अपेक्षित निधी किती आवश्यक आहे. त्यानुसार निधीची मागणी केली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे. भविष्यात नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था या सारख्या त्रयस्थ संस्थेकडून कामाचे लेखा परिक्षण करण्यात यावे. जेणे करुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान या सारख्या संस्थांना अहवाल सादर करतील.

वालधूनी नदी नागरीककरण आणि आजूबाजूच्या वस्तीतून सोडल्या जाणा:या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. टाकाऊ वस्तू नदीत टाकल्या जातात. काही कंपन्या रसायन मिश्रित सांडपाणी नदी पात्रत सोडतात. नदीतील पाणी आणि नदीखालील भूस्तर प्रदूषित झाला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात प्रदूषित  वालधूनी नदी आहे.  त्याच प्रमाणो बारमाही वाहणारी उल्हास नदीही प्रदूषित होत आहे. जी सगळ्य़ात मोठा जलस्त्रोत आहे. तिचे प्रदूषण रोखणो हा कळीचा मुद्दा आहे. या दोन्ही नद्यांचे होणारे प्रदूषण रोखून त्यांचे शुद्धीकरण करणो गरजेचे असल्याकडे खासदार शिंदे यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे. लोकसभेच्या मागच्या अधिवेशनातही खासदारांनी नदी प्रदूषण रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण