शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कबड्डी : पुणे, मुंबई शहर यांना कुमार व कुमारी गटाचे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:44 IST

कुमार/कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१८

मुंबई : कुमार/कुमारी गट  ४५व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुण्याने कुमार गटात गतविजेत्या कोल्हापूरला ४३-२४असे पराभूत करीत " स्व. नारायण नागु पाटील चषकावर" आपले नाव कोरले. तर कुमारी गटात मुंबई शहराने गतउपविजेत्या साताऱ्याला ३३-३२असे चकवित "स्व. चंदन सखाराम पांडे चषक" आपल्याकडे खेचून आणला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती.

शेलू-परभणी येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरीत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने कोल्हापूरचा अगदी सहज पाडाव केला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीनें खेळला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला १८-१६ अशी नाममात्र आघाडी पुण्याकडे होती. या डावात कोल्हापूरवर होणारा लोण त्यांनी दोन वेळा अव्वल पकड करीत पुढे ढकलला. पण उत्तरार्धात पुण्याने जोरदार मुसंडी मारत पहिल्या पाच मिनिटात कोल्हापूरवर लोण देत आघाडी घेतली. त्यानंतर आणखी दोन लोण देत त्यांनी सामना एकतर्फी केला. उत्तरार्धात कोल्हापूरचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला. उत्तरार्धात अभिषेक भोसले, पवन करांडे, अभिजित चौधरी यांनी टॉप गियर टाकत चढाई - पकडीत भराभर गुण घेत पुण्याला १९ गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळवुन दिला. कोल्हापूर कडून सौरभ पाटील, तेजस पाटील, प्रथमेश साळवी यांनी पूर्वार्धात दाखविलेला जोश उत्तरार्धात मात्र त्यांना दाखविता आला नाही. म्हणूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

      मुलींचा अंतिम सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. यात मुंबईने केलेला एकमात्र बोनस गुण त्यांना विजयासाठी महत्वाचा ठरला. पहिल्या डावात मुंबईने भक्कम बचाव व आक्रमक चढाईच्या जोरावर साताऱ्यावर दोन लोण देत विश्रांतीला २१-०६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. पण उत्तरार्धात या पायाला साताऱ्याच्या सोनाली हेळवीने सुरुंग लावला.त्याला मुंबईने देखील अति सावध पवित्रा घेत साथ दिली. तिने वैष्णवी व प्रतीक्षा जगताप यांच्या सहाय्याने मुंबईने दिलेल्या दोन लोणची परतफेड करीत सामन्यात चुरस निर्माण केली. पण बोनस गुण साताऱ्याच्या विजयात अडसर ठरला.

प्रतीक्षा तांडेल, ऋणाली भुवड यांच्या धारदार चढाया त्याला जागृती घोसाळकर, ज्योती डफळे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे शेवटी मुंबईने एका गुणाने हा विजय साकारला. नोव्हेंबर २०१३ साली वाडा-ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत मुंबईने अंतिम विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्यांना ही संधी उपलब्ध झाली. या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने पालघरला, कोल्हापुरने ठाण्याला, तर मुलींच्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने रत्नागिरीला आणि साताऱ्याने कोल्हापूरवर मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

टॅग्स :Kabaddiकबड्डीPuneपुणेMumbaiमुंबई