शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Asian Games 2018: फेडरेशनच्या कलहामुळे आम्ही हरलो; भारतीय कबड्डी संघाच्या कर्णधाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 08:35 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबई - आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष संघाची १९९० पासूनची आणि महिला संघाची २०१० पासूनची सुवर्णपदक जिंकण्याची परंपरा जकार्ता येथे खंडित झाली. 

या अपयशाला भारतीय कबड्डी फेडरेशनमध्ये सुरु असलेले कलह जबाबदार असल्याची टीका महिला संघाची कर्णधार पायल चौधरीने केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला. त्याचसोबत अंतिम लढतीत पंचांचे काही निर्णय चुकल्याचेही तिने सांगितले. 

ती म्हणाली,' आशियाई संघ निवडीवरून काही माजी खेळाडूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा संघ निवड चाचणी घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आम्ही येथू सुवर्ण जिंकून परतलो असतो तरी त्याचा आम्हाला काहीच अतिरिक्त फायदा मिळणारा नव्हता आणि पुन्हा निवड चाचणी झाली असती, अशाही चर्चा सुरु होत्या. हे सर्व आम्ही आशियाई स्पर्धेला रवाना होणार त्याच दिवशी आम्हाला कळले. त्याचे मानसिक दडपण कुठेतरी संघातील प्रत्येक खेळाडूवर होते.' 

भारताचे माजी खेळाडू होनप्पा सी गोवडा आणि एस राजराथनम यांनी संघ निवड करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाKabaddiकबड्डीSportsक्रीडा