शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'तिच्या'साठी काय पण! भाच्याचं आत्यावरच प्रेम जडलं, 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:15 IST

The young man fell in love with his aunt : भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. बिहारच्या चंपारणमध्ये ही अजब घटना घडली आहे. भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. घराच्यांचा विरोध असल्याने पळून जाऊन त्यांनी शिव मंदिरात लग्न केलं आहे. ही घटना उघड झाल्यावर सर्वांनाच धक्का बसला असून नातेवाईक हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नात्याने आत्या असणाऱ्या मुलीसोबत मुलाचं प्रेम प्रकरण असल्याने कुटुंबीयांनी त्यांना क़डाडून विरोध केला होता. 

आत्या आणि भाचा या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, की वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली, जेणेकरुन ते लग्न करू शकतील. त्यानंतर कुटुंबाच्या विरोधात जाऊन ते दोघेही पळून गेले. दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय 18 वर्ष असून भाच्याचं म्हणजेच नवरदेवाचं वय 19 वर्ष आहे. सहा वर्षांपूर्वी आदित्य पटेल आपल्या मामाकडे एका लग्नासाठी आला होता. त्यावेळी त्याचं नात्याने आत्या असणाऱ्या आंचल पटेलवर प्रेम जडलं. दोघांचं ही एकमेकांवर प्रेम होतं. अनेक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. 

मुलगी नात्याने मुलाची आत्या लागत असल्याने मुलाच्या कुटुंबाचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. मुलीने कुटुंबीय तिला मारहाण करत असल्याचं सांगितलं. परंतु जसं मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर तीन दिवसांनी तिने घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न केलं. मुलगी घरात नसल्याने तिची शोधाशोध झाली. तिचे कुटुंबिय थेट मुलाच्या घरी पोहोचले. त्यावेळी या दोघांनी लग्न केल्याचं समजलं. शेवटी दोघांच्या हट्टापुढे कुटुंबीय देखील झुकले. या लग्नाची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार