शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिवंत झाला तरुण; म्हणाला, यमदुतांनी चुकून नेले होते प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 16:26 IST

माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का?

ठळक मुद्देपंजाबमधील एका गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहेपंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावातील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होतेमात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला

चंदिगड -  माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का? पण पंजाबमधील एका गावामध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.  येथील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दु:खद प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली. मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला.  दरम्यान, यमदूतांनी चुकून आपले प्राण नेल्याचा दावा या तरुणाने केला आहे. हा प्रकार पंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावात घडला आहे. येथील सिंगारा सिंह यांचा मुलगा गुरतेज सिंह याला अंधूक दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते.  अधिक उपचारांसाठी त्याला चंदिगडमधील पीजीआय येथे दाखल करण्यात आले. तेथे 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र त्याचे डेथ सर्टिफिकेट त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आले नाही. कुटुंबीयांनी गुरतेग याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली.  अंत्यसंस्कारासाठी त्याचे कपडे बदलत असताना शेजाऱ्यांना त्याचे श्वसन सुरू असल्याचे जाणवले. त्यामुळे शेजारच्या केमिस्ट शॉपमध्ये काम करणाऱ्याला बोलावले गेले. त्याने गुरतेजचा श्वासोश्वास सुरू असल्याचे सांगितले. त्यादरम्यान गुरतेग उठून बसला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला सिव्हील रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी गुरुतेज याला फरीदकोट येथील बाबा फरीद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, या प्रकारामुळे गुरतेजच्या कुटुंबीयांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूPunjabपंजाब