शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

भारतातील पहिला मोबाईल कॉल कुणी, कधी आणि कुणाला केला होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 12:11 IST

आजकाल तर गरिब असो वा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल असतात. पण २० वर्षांआधी ही स्थिती फारच वेगळी होती. ९०च्या दशकात कुणाच्या हातात मोबाईल दिसला तर त्याला हायफाय मानलं जायचं.

(Image Credit : unsplash.com)

आजकाल तर गरिब असो वा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल असतात. पण २० वर्षांआधी ही स्थिती फारच वेगळी होती. ९०च्या दशकात कुणाच्या हातात मोबाईल दिसला तर त्याला हायफाय मानलं जायचं. कारण त्यावेळी हजारोंमधील काही मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. पण भारतात सर्वात पहिला मोबाईल कुणी वापरला होता? याचं उत्तर अनेकांकडे नसेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर देणार आहोत. 

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी कोलकातातील रायटर्स बिल्डींगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये असलेले केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाईल कॉल केला होता. यादरम्यान ज्योति बसू यांनी कॉल करण्यासाठी नोकिया २११० हा हॅंडसेट वापरला होता.

(Image Credit : news18.com)

'मोदी टेल्स्ट्रा' भारतात मोबाईल सेवा सुरू करणारी पहिली कंपनी होती. या सर्व्हिसचं नाव मोबाईल नेट असं ठेवण्यात आलं होतं. या सर्व्हिसला लोकांपर्यत पोहचवण्यासाठी नोकिया हॅंडसेटटी मदत घेतली गेली. 'मोदी टेल्स्ट्रा' नंतर स्पाइस टेलिकॉम ही कंपनी सेवा देऊ लागली. 

कोलकाताला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू आणि 'मोदी टेल्स्ट्रा' चे चेअरमन बी.के.मोदी यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर यावर काम सुरू झालं. साधारण १० महिन्यांनंतर मोदी टेस्ल्ट्राचे चेअरमन बी.के.मोदी पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी भेटण्यास गेले. यावेळी मोदी पूर्ण तयारीसोबत आले होते. यावेळी भारतात आधी कधीच झालं नाही ते झालं. देशातील पहिला मोबाईक कॉल यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेMobileमोबाइलNokiaनोकिया