शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 11:03 IST

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही.

(Image Credit : tripadvisor.in)

अहिल्यानगरी इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणमध्ये बुरहानपूर हे शहर आहे. बुरहानपूर हे शहर आपल्या चलेबीसाठी भारतभर लोकप्रिय आहे. पण हे शहर केवल मिठाईसाठीच लोकप्रिय नाही. आग्र्यातील प्रसिद्ध संगमरमरचा मकबरा ताजमहालला जगात प्रेमाची निशाणी मानलं जातं. याची सुंदरता आजही लोकांना मोहित करते.

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही. असा दावा केला जातो की, ताजमहालची आयडिया मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमधून घेतली गेली. आग्र्याचा ताजमहाल आणि काळा ताजमहालची बनावट मिळती-जुळती आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही की, शाहजहांने याच मकबऱ्याहून ताजमहाल बनवण्याची आयडिया घेतली. 

काळा ताजमहाल

आग्र्यातील ताजमहाल हा शाहजहांने त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधला होता. आर्किटेक्टरच्या दृष्टीने हा उत्कृष्ट मकबरा आहे. असे म्हटले जाते की, शाहजहांला मध्य प्रदेशच्या बुरहानपुर येतील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची आयडिया आली.

दरम्यान बुरहानपूर येथील काळ्या ताजमहालाबाबत माहिती तशी कमीच लोकांना आहे. अनेक वर्षांपासून वातावरणाचा मार, पशु-पक्ष्यांचा गोंधळ आणि सरकारचं दुर्लंक्ष सहन सहन केल्यावर २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने याची काळजी घेणं सुरू केलं. आज हा काळा ताजमहाल आकर्षण ठरतो आहे.

शाहनवाज खानचा मकबरा

इतिहासकारांनुसार, काळा ताजमहाल शाहनवाज खानचा मकबरा आहे. अब्दुल रहीम खानखानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान. बुरहानपूरमध्ये जन्माला आलेल्या खानच्या बहादुरीचे आणि शौर्याचे किस्से प्रसिद्ध आहे. त्यानेच त्याला मुघल फौजेचा सेनापती केलं होतं. शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच काळा ताजमहाल बनवला आहे.

The Hindu मधील एका लेखानुसार, काळ्या दगडापासून तयार केलेल्या या मकबऱ्याला काळाने आणखीन काळं केलं आहे. मकबऱ्याला जवळून पाहिल्यावर लक्षात येतं की, एके काळी हा किती सुंदर असेल.

बुरहापूरमध्येच शाहजहांची दुसरी पत्नी मुमताजने अखेरचा श्वास घेतला होता आणि इथेच तिचा मकबरा तयार केला जाणार होता. मुमताजने इथेच आपल्या १४व्या बाळाला जन्म देऊन अखेरचा श्वास घेतला होता. बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक, वाळवी असल्याने ताजमहाल आग्र्याला बांधण्यात आला. बुरहानपूरचा काळा ताजमहाल आज धुळ खात आहे आणि फार लोकप्रिय होऊ शकला नाही जेवढ्या इतर मुघलकालीन इमारती झाल्या. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके