शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 11:03 IST

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही.

(Image Credit : tripadvisor.in)

अहिल्यानगरी इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणमध्ये बुरहानपूर हे शहर आहे. बुरहानपूर हे शहर आपल्या चलेबीसाठी भारतभर लोकप्रिय आहे. पण हे शहर केवल मिठाईसाठीच लोकप्रिय नाही. आग्र्यातील प्रसिद्ध संगमरमरचा मकबरा ताजमहालला जगात प्रेमाची निशाणी मानलं जातं. याची सुंदरता आजही लोकांना मोहित करते.

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही. असा दावा केला जातो की, ताजमहालची आयडिया मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमधून घेतली गेली. आग्र्याचा ताजमहाल आणि काळा ताजमहालची बनावट मिळती-जुळती आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही की, शाहजहांने याच मकबऱ्याहून ताजमहाल बनवण्याची आयडिया घेतली. 

काळा ताजमहाल

आग्र्यातील ताजमहाल हा शाहजहांने त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधला होता. आर्किटेक्टरच्या दृष्टीने हा उत्कृष्ट मकबरा आहे. असे म्हटले जाते की, शाहजहांला मध्य प्रदेशच्या बुरहानपुर येतील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची आयडिया आली.

दरम्यान बुरहानपूर येथील काळ्या ताजमहालाबाबत माहिती तशी कमीच लोकांना आहे. अनेक वर्षांपासून वातावरणाचा मार, पशु-पक्ष्यांचा गोंधळ आणि सरकारचं दुर्लंक्ष सहन सहन केल्यावर २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने याची काळजी घेणं सुरू केलं. आज हा काळा ताजमहाल आकर्षण ठरतो आहे.

शाहनवाज खानचा मकबरा

इतिहासकारांनुसार, काळा ताजमहाल शाहनवाज खानचा मकबरा आहे. अब्दुल रहीम खानखानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान. बुरहानपूरमध्ये जन्माला आलेल्या खानच्या बहादुरीचे आणि शौर्याचे किस्से प्रसिद्ध आहे. त्यानेच त्याला मुघल फौजेचा सेनापती केलं होतं. शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच काळा ताजमहाल बनवला आहे.

The Hindu मधील एका लेखानुसार, काळ्या दगडापासून तयार केलेल्या या मकबऱ्याला काळाने आणखीन काळं केलं आहे. मकबऱ्याला जवळून पाहिल्यावर लक्षात येतं की, एके काळी हा किती सुंदर असेल.

बुरहापूरमध्येच शाहजहांची दुसरी पत्नी मुमताजने अखेरचा श्वास घेतला होता आणि इथेच तिचा मकबरा तयार केला जाणार होता. मुमताजने इथेच आपल्या १४व्या बाळाला जन्म देऊन अखेरचा श्वास घेतला होता. बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक, वाळवी असल्याने ताजमहाल आग्र्याला बांधण्यात आला. बुरहानपूरचा काळा ताजमहाल आज धुळ खात आहे आणि फार लोकप्रिय होऊ शकला नाही जेवढ्या इतर मुघलकालीन इमारती झाल्या. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके