शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

राँग नंबरमुळे सुरु झाली प्रेमकहाणी पण लग्न झाल्यानंतर महिलेला पोलिसांकडे घ्यावी लागली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:00 IST

महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे.

बिहारमधील नालंद जिल्ह्यातून एक विचित्र प्रेमकथा (Weird Love Story) समोर आली आहे. एका महिलेच्या पतीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. यानंतर ती आईसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. तिला ३ मुलेदेखील आहेत. अचानक एके दिवशी तिला एका राँग नंबरवरून फोन आला आणि पुढे दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. या संवादाचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळालं नाही. दोघांनी सोबत राहायचं ठरवलं आणि प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन गेला (Love Story Started with a Call on Wrong Number). आता महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस स्टेशन परिसरातील डॉक्टर कॉलनीतील आहे. महिला डॉक्टर कॉलनीजवळ आपल्या दोन मुलांसह बसून आपल्या प्रियकराला परत बोलावण्यासाठी सर्वसामान्यांनाही विनवणी करत आहे. या घटनेबाबत अस्थावा येथील रहिवासी गुडिया देवीने सांगितलं की, १ वर्षापूर्वी मालती गावातील रहिवासी सुनील यादव तिच्या भांगात कुंकू भरून तिला पानिपतला घेऊन गेला होता.

वर्षभर तिथे राहिल्यानंतर, आता घरूनच काम करून कमाई करू, असं सांगत तो एका आठवड्यापूर्वी तिला परत पाटणा येथे घेऊन आला. महिलेचा असा आरोप आहे, की पाटणा येथे आल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी जात असल्याचं सांगून तो फरार झाला. एक आठवडा ती आपल्या दोन मुलांसोबत पाटणा स्टेशनवर बसून त्याची वाट बघत राहिली. मात्र तो आला नाही.

यानंतर महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाब असल्याने स्थानकप्रमुखांनी महिलेला तिथे जाण्याचा सल्ला दिला. महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं होतं, त्यानंतर ती आपल्या आईसोबत मुलांसह अस्थावा येथे भाड्याच्या घरात राहू लागली. दरम्यान, वर्षभरापूर्वी राँग नंबरवरून फोन आला आणि तिचं सुनीलशी बोलणं सुरू झालं.

बोलणं सुरू असतानाच दोघांचा एकमेकांवर प्रेम ज़डलं. महिलेनं सांगितलं की, एके दिवशी सुनीलने तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिच्या दोन मुलांसह तिला घेऊन पानिपतला गेला. महिलेला तीन मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्षांची, तर ८ वर्षांचा मुलगा ऋषभ आणि सूर्यांश ५ वर्षांचा आहे. आता महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता ती ना तिच्या माहेरच्या घरी जाऊ शकते ना सासरच्या घरी.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके