शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

जगाची लोकसंख्या '८ अब्ज' चा आकडा पार करणार! भारताची चिंता वाढणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:49 IST

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे.

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी बनवलेल्या अहवालात हे नमुद केले आहे की येणाऱ्या दशकात लोकसंख्येमध्ये होणारी वाढ ही सुरुच राहील. तर २०५० पर्यंत आयुर्मान सरासरी ७७.२ वर्षांपर्यंत वाढेल. एवढेच काय तर १५ नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीवर लोकसंख्या ८ अब्ज एवढी असे. ही लोकसंख्या १९५० सालच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. १९५० साली पृथ्वीवरील लोकसंख्या २.५ अब्ज इतकी होती.

२०२१ मध्ये प्रत्येक स्त्री च्या मागे सरासरी प्रजनन दर २.३ इतका होता. १९५० मध्ये ५ तर २०५० पर्यंत हा दर २.१ च्या खाली येईल अशी शक्यता आहे. सरासरी आयर्मान वाढणे हे लोकसंख्येचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्यांनी २०५० पर्यंत सरासरी आयुर्मान ७७.२ वर्षे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. वेगवेगळया देशांमधल्या सरासरी वयात भिन्नता आहे. 

चीनची लोकसंख्या कमी तर भारताची चिंता वाढणार?संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अहवालानुसार २०२३ च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीत भारत पहिल्या क्रमांकावर येईल. तर सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला चीन दुसऱ्या क्रमांकावर जाईल. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे तर २०५० पर्यंत १.३ अब्ज झालेली असेल. आकडे हेही सांगतात की शतकाच्या शेवटपर्यंत चीनची लोकसंख्या ८० कोटी इतकी खाली येण्याची शक्यता आहे.