शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जगाची लोकसंख्या '८ अब्ज' चा आकडा पार करणार! भारताची चिंता वाढणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:49 IST

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे.

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी बनवलेल्या अहवालात हे नमुद केले आहे की येणाऱ्या दशकात लोकसंख्येमध्ये होणारी वाढ ही सुरुच राहील. तर २०५० पर्यंत आयुर्मान सरासरी ७७.२ वर्षांपर्यंत वाढेल. एवढेच काय तर १५ नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीवर लोकसंख्या ८ अब्ज एवढी असे. ही लोकसंख्या १९५० सालच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. १९५० साली पृथ्वीवरील लोकसंख्या २.५ अब्ज इतकी होती.

२०२१ मध्ये प्रत्येक स्त्री च्या मागे सरासरी प्रजनन दर २.३ इतका होता. १९५० मध्ये ५ तर २०५० पर्यंत हा दर २.१ च्या खाली येईल अशी शक्यता आहे. सरासरी आयर्मान वाढणे हे लोकसंख्येचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्यांनी २०५० पर्यंत सरासरी आयुर्मान ७७.२ वर्षे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. वेगवेगळया देशांमधल्या सरासरी वयात भिन्नता आहे. 

चीनची लोकसंख्या कमी तर भारताची चिंता वाढणार?संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अहवालानुसार २०२३ च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीत भारत पहिल्या क्रमांकावर येईल. तर सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला चीन दुसऱ्या क्रमांकावर जाईल. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे तर २०५० पर्यंत १.३ अब्ज झालेली असेल. आकडे हेही सांगतात की शतकाच्या शेवटपर्यंत चीनची लोकसंख्या ८० कोटी इतकी खाली येण्याची शक्यता आहे.