शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 15:26 IST

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात?

भारतात असे अनेक गुन्हे घडले आहेत ज्यासाठी कोर्टाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही न्यायाधीशासाठी फाशीची शिक्षा सुनावणं सोपं नसतं. पण काही गुन्ह्यासाठी अशी शिक्षा देण्याशिवाय दुसरा उपायही नसतो. त्यामुळे फार विचार केल्यानंतर नियमानुसार न्यायाधीश साहेबांना हा निर्णय घ्यावा लागतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.

काय तोडतात पेनाची निप?

फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप तोडतात आणि असं करण्याला सिम्बॉलिक अॅक्ट म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा पेनाची निप १९४९ मध्ये तोडली गेली होती. तेव्हा महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथूराम गोडसे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पंजाब उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गोडसेला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर पेनाची निप तोडली होती. (हे पण वाचा :भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)

असं करण्याचं एक कारण नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. असं म्हटलं जातं की, न्यायाधीशांसाठी कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणं फार कठिण असतं. ते पेनाची निप तोडून शिक्षा सुनावताना आतून होत असलेल्या त्रासाला व्यक्त करतात. यासोबतच त्यांचा असाही मानस असतो की, आता त्यांना पुन्हा अशाप्रकारची शिक्षा सुनावण्याची वेळ येऊ नये. (हे पण वाचा : Interesting Facts : रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का दिलेला असतो? वाचा काय आहे कारण....)

त्यासोबतच असंही म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप तोडतात कारण की, त्यांचा हा निर्णय बदलला जाऊ नये म्हणून. उच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय न्यायाधीशांचा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. इतकंच काय तर स्वत: न्यायाधीशही नाही. त्यामुळेच पेनाची निप तोडून न्यायाधीश हे स्पष्ट करतात की, फाशीची शिक्षा सुनावल्यावर ती बदलली जाऊ शकत नाही.

न्यायाधीशांकडून पेनाची निप तोडण्याचं आणखी एक कारण आहे असं म्हटलं जातं की, न्यायाधीश पेनाची निप यासाठी तोडतात कारण तो पेन पुन्हा वापरला जाऊ नये. कारण त्या पेनाने एका व्यक्तीचा मृत्यू लिहिला जातो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेCourtन्यायालय