शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:30 IST

रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

Indian Railway : प्रत्येक रेल्वेमध्ये जनरल डबा मधे का लावला जात नाही? जनरल डबा हा नेहमी मागे किंवा पुढच्या बाजूलाच का असतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर रेल्वेकडून याबाबतचं प्लानिंग विचार करूनच केलेलं असतं. रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिननंतर किंवा सगळ्यात मागे जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावलेले असतात. जनरल डबे मागे किंवा पुढे लावण्यावर एका प्रवाशाने तर रेल्वेवरच जनरल डबे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा आरोप लावला आहे. 

ट्विटरवर त्याने आरोप लावला की, रेल्वेचे जनर डबे यासाठी रेल्वेच्या मागे किंवा पुढे असतात जेणेकरून दुर्घटना झाल्यावर सगळ्यात जास्त नुकसान गरीब प्रवाशांचं व्हावं. पण रेल्वे विभागाने त्याचे आरोप फेटाळून लावत सांगितलं की, रेल्वे संचालनाच्या नियमांनुसारच डब्यांची जागा ठरते. यात श्रेणी महत्वाची नसते.

जाणून घ्या कारण...

जनरल डब्यांना या क्रमात प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा ध्यानात ठेवून लावले जातात. सोबतच जनरल डबे मागे-पुढे लावल्याने रेल्वेचा बॅलन्सही बरोबर राहतो. कोणत्याही रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. अशात जर जनरल डबे मधे असले तर जास्त भार मधे पडेल आणि यामुळे रेल्वेचं संतुलन बिघडू शकतं. असं झालं तर बोर्ड-डीबोर्डमध्ये अडचण येऊ शकते. जनरल डबे मधे ठेवले तर सिटींग अरेंजमेंटसोबत इतर व्यवस्थाही व्यवस्थित होणार नाही. यामुळे प्रवाशी त्यांचं सामान घेऊन एकीकडून दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत. याच कारणाने जनरल डबे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन कोपऱ्यांवर लावले जातात.

इमरजन्सी

रेल्वे एक्सपर्ट्स यांचं यावर मत आहे की, जनरल डबे रेल्वेच्या दोन्ही टोकांवर असणं सेफ्टीच्या दृष्टीनेही चांगलं आहे. असं केल्याने जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी अंतरामुळे दोन भागांमध्ये विभागली जाते. याने कोणत्याही आपातकालीन स्थितीत लोकांना रेल्वेतून बाहेर निघणं सोपं होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके