शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:22 IST

या दिवशी वर्षभरातील जमापूंजी देवासमोर ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो.

ठळक मुद्देधनप्राप्तीसाठी आपण धनाची पूजा करतो म्हणूनच हा दिवस व्यापारी वर्गासाठी महत्वाचा असतो. धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी वैद्य रुग्णांना कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात.

धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून या सणाकडे पाहिलं जातं. आपल्या धनाची पूजा करून आपल्या भरभराटीसाठी या धनलक्ष्मीचे आज पूजन केले जाते. तसंच आज सुवर्ण विकत घेण्याचीही प्रथा आहे. साडेतीन मुहूर्तापैकी शुभ मानल्या जाणाऱ्या मुहूर्तात धनत्रयोदशीचाही  समावेश आहे. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं, वास्तु खरेदी-विक्री होते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यापारी वर्गासाठी हा सण फार मोठा असतो. धनत्रयोदशीविषयी अशीच काही माहिती जाणून घेऊया.

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारी धनत्रयोदशी सुख, संपत्तीचे द्योतक आहे. ज्या गोष्टींमुळे आपला उदरनिर्वाह होत असतो त्याची आज पूजा करण्याचा दिवस. म्हणजे आपल्याजवळील धनाची पूजा करण्याचा दिवस. जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांनाही आपल्या संस्कृतीत धन म्हटलं जातं.

धनप्राप्तीसाठी आपण धनाची पूजा करतो म्हणूनच हा दिवस व्यापारी वर्गासाठी महत्वाचा असतो. लहान व्यापारी वर्ग त्यांचं व्यवसायिक वर्ष दिवाळी ते दिवाळी असं साजरा करतात. त्यामुळे या दिवशी नवीन चोपडी आणून त्याची पूजा केली जाते आणि नव्या वर्षाची सुरुवात केली जाते. काहींच्या मते या दिवशी वर्षभरातील जमापूंजी देवासमोर ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्यास वर्षभर घरात सुख, संपत्ती नांदते असं म्हटलं जातं. त्यामुळे कित्येकजण थोड्याफार प्रमाणात का होईना आज सोने खरेदी करतातच.

आजचा दिवस वैद्यांसाठीही महत्वाचा असतो. धनत्रोयदशीदिवशी धन्वंतरी देवेतची जंयती साजरी केली जाते. त्यामुळे आज वैद्य धन्वंतरी देवतेची पूजा करतात. चार हात असलेल्या धन्वंतरिच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख तर चौथ्या हातात चक्र असते. या साऱ्या गोष्टींच्या आधारे धन्वंतरि रोगांना आणि व्याधींना बरे करत असतात. तसेच आजच्या दिवशी वैद्य रुग्णांना कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात.

टॅग्स :diwaliदिवाळीIndian Traditionsभारतीय परंपरा