शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:52 IST

Expiry Date On Water Bottle : जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.

Expiry Date On Water Bottle : उन्हाळा असो वा नसो पाण्याच्या बॉटल विकत घेण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. पावसाळा असला तरी भरपूर लोक प्रवास करताना किंवा कुठे बाहेर गेलेले असताना पाण्याची बॉटल विकत घेऊन पाणी पितात. या बॉटलमधील पाणी शुद्ध आणि हेल्दी मानलं जातं. हे पाणी बेकारही होत नाही. मग जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. चला तर पाहुया यामागचं कारण...

पाण्याची नसते एक्सपायरी डेट, मग...?

जर पाण्याची एक्सपायरी डेट नसते तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिली जातं? तर पाण्याची जरी एक्सपायरी डेट नसली तरी, पाणी स्टोर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बॉटलची नक्कीच एक्सपायरी डेट असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

सोबतच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते कारण ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि ते पिणं नुकसानकारक ठरू शकतं. 

बॉटलची एक्सपायरी डेट

एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते आणि याचं सेवन सुरक्षित असू शकत नाही. जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ग्राहकांनी त्यातील पाणी पिऊ नये. हेही खरं आहे की, एका कालावधीनंतर  प्लास्टिक पाण्यात मिक्स होणं सुरू होतं आणि याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके