शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:53 IST

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते.

नवी दिल्ली – युपीएससी परीक्षा जितक्या कठीण असतात तितकेच परीक्षा पास झाल्यानंतर असणारी मुलाखतही कठीण असते. ज्यात अशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा अंदाज तुम्हाला पटकन शोधून काढणं अडचणीचं ठरतं. या मुलाखतीच्या माध्यमातून समोरचा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र आहे की नाही? हे ठरवलं जातं. त्यामुळे आयएएस होणं किती कठीण काम आहे हे या मुलाखतीवरुनही दिसून येते.

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते. ही कठीण परीक्षा पास करणारे ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती होते. योगेश मिश्रा यांनी एका चॅनेलच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मला यूपीएससी(UPSC) मुलाखतीत असा प्रश्न विचारण्यात आला होता जो प्रत्येक उमेदवाराला विचारण्यात येतो.

मी मुलाखत देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा समोर असणाऱ्या पॅनेलिस्टमधील चेअरमनने मला विचारले, तुला आएएस(IAS) का बनायचं आहे? सर्वसामान्य जेवढे उमेदवार असतात त्यांना हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यावेळी मला काही स्पष्टता नव्हती, म्हणून माझ्या तोंडातून उत्तर आले की, मला स्वत:लाच माहिती नाही मला आयएएस का बनायचं आहे. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते कारण माझ्या उत्तराकडे पॅनेल जास्त लक्ष दिलं नाही ते म्हणाले, मी माझा प्रश्न बदलतो.

त्यानंतर पॅनेलिस्टने प्रश्न विचारला की, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, चांगल्या पदावर नोकरी करत होता. तरीही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? पॅनेलिस्टने प्रश्न बदलला तसे मीही माझंही उत्तर बदलले असं योगेश मिश्रा यांनी सांगितले. यूपीएसएसीच्या मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील हे तुम्हाला माहिती नाही. पण पॅनेल कोणत्याही उमेदवारामध्ये हे पाहते की, तणावाच्या स्थितीत तुम्ही स्वत:चं भान विसरता की स्वत:ला नियंत्रणात ठेवता असं योगेश यांनी सांगितले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग