शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:53 IST

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते.

नवी दिल्ली – युपीएससी परीक्षा जितक्या कठीण असतात तितकेच परीक्षा पास झाल्यानंतर असणारी मुलाखतही कठीण असते. ज्यात अशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा अंदाज तुम्हाला पटकन शोधून काढणं अडचणीचं ठरतं. या मुलाखतीच्या माध्यमातून समोरचा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र आहे की नाही? हे ठरवलं जातं. त्यामुळे आयएएस होणं किती कठीण काम आहे हे या मुलाखतीवरुनही दिसून येते.

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते. ही कठीण परीक्षा पास करणारे ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती होते. योगेश मिश्रा यांनी एका चॅनेलच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मला यूपीएससी(UPSC) मुलाखतीत असा प्रश्न विचारण्यात आला होता जो प्रत्येक उमेदवाराला विचारण्यात येतो.

मी मुलाखत देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा समोर असणाऱ्या पॅनेलिस्टमधील चेअरमनने मला विचारले, तुला आएएस(IAS) का बनायचं आहे? सर्वसामान्य जेवढे उमेदवार असतात त्यांना हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यावेळी मला काही स्पष्टता नव्हती, म्हणून माझ्या तोंडातून उत्तर आले की, मला स्वत:लाच माहिती नाही मला आयएएस का बनायचं आहे. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते कारण माझ्या उत्तराकडे पॅनेल जास्त लक्ष दिलं नाही ते म्हणाले, मी माझा प्रश्न बदलतो.

त्यानंतर पॅनेलिस्टने प्रश्न विचारला की, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, चांगल्या पदावर नोकरी करत होता. तरीही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? पॅनेलिस्टने प्रश्न बदलला तसे मीही माझंही उत्तर बदलले असं योगेश मिश्रा यांनी सांगितले. यूपीएसएसीच्या मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील हे तुम्हाला माहिती नाही. पण पॅनेल कोणत्याही उमेदवारामध्ये हे पाहते की, तणावाच्या स्थितीत तुम्ही स्वत:चं भान विसरता की स्वत:ला नियंत्रणात ठेवता असं योगेश यांनी सांगितले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग