शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:08 IST

Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.

Knowledge : परंपरेनुसार मृत्यूनंतर व्यक्तीला अग्नी देऊन मुक्ती दिली जाते. मृत शरीराला अग्नी दिल्यावर काही तासांमध्ये शरीर जळून राख बनतं. यावेळी हाडेही राख बनतात. पण काही हाडे पूर्ण जळत नाहीत. नंतर या अस्थी नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. पण यावेळी शरीरातील एक असा भाग असतो जो या आगीत जळत नाही आणि राखही होत नाही. तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.

सामान्यपणे 670 ते 810 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमानात शरीर 10 मिनिटात वितळू लागतं. ते 20 मिनिटांनी हाडांपासून नरम टिश्यू निघून जातात. तर 30 मिनिटांमध्ये पूर्ण त्वचा जळून जाते. कवटीवर भेगा पडू लागतात. एका माहितीनुसार 40 मिनिटांनंतर शरीरातील आतील अवयव जळून स्पंजसारखे दिसू लागतात. 50 मिनिटांनी हात आणि पाय जळून जातात. त्यानंतर धड जळून राख होतं. मानवी शरीर पूर्ण जळण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ लागतो. पण त्यानंतरही एक भाग जळत नाही.

कोणते अवयव जळत नाहीत?

मृत्यूनंतर कुणाला अग्नी दिल्यावर पूर्ण शरीर जळून राख बनतं. पण फक्त दात जळत नाहीत. शरीर जळाल्यानंतर हा एक भाग जो तसाच राहतो. वैज्ञानिकांनुसार, दात न जळण्यामागे सायंटिफिक कारण आहे. दात हे कॅल्शिअम फॉस्फेटपासून बनलेले असतात आणि ते आगीत जळत नाही. अग्नी दिल्यावर दातांवरील नरम ऊती जळून जातात. तर सगळ्यात कठोर ऊती तशाच राहतात. ऊती म्हणजे अनेक कोशिकांपासून बनलेला समूह असतो. 

काही हाडेही कमी तापमानावर पूर्ण जळून राख होत नाहीत. वैज्ञानिकांनुसार शरीरातील सगळी हाडे जाळण्यासाठी 1292 डिग्री फ़ारेनहाइट इतक्या उच्च तापमानाची गरज असते. इतक्या तापमानातही कॅल्शिअम फॉस्फेट पूर्णपणे जळून राख होत नाही.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके