शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

Toraja Indonesia: येथे मृत व्यक्तीला दिले जाते गरमागरम जेवण, मृत देहाचे फोटो पाहुन उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:50 IST

या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

जगात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा पाहायला मिळतात. काही परंपरा खूपच विचित्र (Weird Rituals) असतात. त्यांच्याबद्दल समजल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही देशांतील परंपरा तर फारच भयानक आहेत. अशीच एक विचित्र परंपरा इंडोनेशियामध्ये (Indonesia) पाळली जाते. या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

इंडोनेशियामध्ये पाळल्या जाणाऱ्या या परंपरेला 'तोराजा' (Toraja) या नावानं ओळखलं जातं. ही परंपरा या ठिकाणी खूपच प्रसिद्ध आहे. या परंपरेनुसार, जेव्हा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जात नाहीत. कुटुंबीय त्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याजवळच ठेवतात. घरातील इतर सदस्यांप्रमाणे या मृतदेहाला वागणूक दिली जाते. एवढंच नाही तर मृतदेहाला दररोज जेवणही (Food) दिलं जातं. कुटुंबातील इतर सदस्य या मृतदेहाची एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणं सेवा करतात.  (Food for Dead Body)

येथील लोकांचा असा विश्वास आहे की, कोणीही मरत नाही, तो फक्त आजारी (Sick) पडतो. त्यामुळे मृत व्यक्तीला आजारी समजून तशी तिची सेवा केली जाते. घरात पाहुणे आले तर तेदेखील मृतदेहाच्या प्रकृतीची विचारपूस करतात. घरातील एका खोलीत मृतदेह ठेवला जातो. हे दृश्य अनेक घरांमध्ये दिसतं. घरात मृतदेह असूनही इतर कुटुंबीय पूर्णपणे सामान्य जीवन जगतात. मृतदेह असलेल्या घरात गेल्यानंतर तिथे एखाद्याचा मृत्यू झाला आहे, असं अजिबात वाटत नाही. या मृतदेहांनाही आंघोळ (Bath) घालण्यात येते आणि त्यांचे कपडेही बदलेले जातात.

आता तुम्ही विचार करत असाल की, मृतदेह इतके दिवस घरात राहिला तरी तो कुजत का नाही? यामागे एक विशेष कारण आहे. या मृतदेहांवर विशिष्ट प्रकारची पानं (Leaves) आणि औषधं रगडली जातात. त्यामुळे मृतदेह खराब होत नाही. जेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूची योग्य वेळ आली आहे, असं इतर लोकांना वाटतं तेव्हा ते मृतदेहावर मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार करतात. या परंपरेत मृतदेह जाळला (Burn) किंवा पुरला (Bury) जात नाही. गावाजवळील डोंगरातील एखादा खडक कापून मृतदेहाची पेटी त्यामध्ये ठेवतात.

इंडोनेशियातील ही परंपरा इतर देशांतील लोकांना विचित्र वाटते. मात्र, तेथील अनेक लोकांचा या परंपरेवर विश्वास असून ते तिचं काटेकोरपणे पालन करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके