शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

आजपासून ४२ दिवस 'या' ९ गावांत TV-फोनवर बंदी, मोठ्या आवाजात बोलण्यासही निर्बंध, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:06 IST

आजची युवा पिढीही वर्षोनुवर्ष सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते

मनाली - हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी देवी देवतांचा वास आहे. कांगडा, शिमला, मंडी, बिलासपूरसह अनेक जिल्हे आहेत ज्याठिकाणी कुठे ना कुठे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. इथं लाखो श्रद्धाळू भाविक दरवर्षी मंदिरात दर्शनासाठी येतात. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात देव प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. याच परंपरेतून मंगळवारी मकरसंक्रांतीपासून ९ दिवस मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले जातात. त्यासोबत गोंगाट करण्यासही मज्जाव घालण्यात येतो. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पर्यटन नगरी मनाली असा भाग आहे जिथे आजही लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत. याठिकाणाचे गावकरी आता पुढील ४२ दिवस ना टीव्ही सुरू करणार, ना मंदिरात पूजा अर्चना करणार, उल्लेखनीय म्हणजे या कालावधीत गावकऱ्यांचे मोबाइलही सायलेंट मोडवर असतात, कोणाचीही रिंगटोन ऐकायला येत नाही. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल परंतु हे सत्य आहे. देवी देवतांच्या आदेशावर ४२ दिवसांसाठी ही प्रथा पाळली जाते. दरवर्षी ही प्रथा न चुकता गावकरी पाळतात. 

मनालीतील गावांसोबतच गौशाल परिसरातील ८ गावांमध्येही देव आदेश जारी झालेत. याठिकाणी टीव्ही, मोबाईल आणि मंदिरातील घंटी वाजवण्यास निर्बंध आहेत. उझी घाटीतल्या ९ गावांमध्ये हजारो वर्षापासून ही देव प्रथा परंपरा ४२ दिवसांसाठी सुरू आहे. या ४२ दिवसांच्या काळात या गावांमधील कुणीही गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलणार नाही. मंदिरात पूजा केली जाणार नाही. देवळातील घंटी बांधून ठेवली जाते. गावकऱ्यांनुसार, आराध्य देवता गौतम ऋषी, ब्यास ऋषी आणि नागदेवता यांच्याकडून हे देव आदेश जारी केले जातात. 

मकर संक्रांतीच्या नंतर देवी देवता त्यांच्या तपस्येत गुंग होतात अशा वेळी देवी देवतांना शांत वातावरण हवं असते. त्यामुळे टीव्ही, रेडिओ मोबाईल सर्वकाही गावकऱ्यांकडून बंद केले जाते. मनालीच्या गौशाल, कोठी सोलंग, पलचान, रूआड, कुलंग, शनाग, बुरूआ, मझाच याठिकाणी हे देव आदेश आहेत. आजची युवा पिढीही वर्षोनुवर्ष सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते. मनालीच्या सिमसा येथील देवता कार्तिक स्वामी मंदिरातील दरवाजे १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश