शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पळून आलेल्या प्रेमीयुगुलांना आश्रय देणारं अनोखं मंदिर, जाणून घ्या कुठे आहे हे मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:27 IST

लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह म्हटला की, आजही घरातून अनेक तरूण-तरुणींना विरोधाचा सामना करावा लागतो. विरोध टोकाला गेला की, कपल पळून जाऊन नवं आयुष्य जगण्याचा मार्ग स्वीकारतात.

लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह म्हटला की, आजही घरातून अनेक तरूण-तरुणींना विरोधाचा सामना करावा लागतो. विरोध टोकाला गेला की, कपल पळून जाऊन नवं आयुष्य जगण्याचा मार्ग स्वीकारतात. पण पळून गेल्यावरही नवीन सुरूवात करणं इतकं सोपं नसतं. पहिला प्रश्न समोर उभा राहतो की, रहायचं कुठे? काहींच निभावतं. पण अनेकांना या प्रश्नासमोर हात टेकावे लागतात आणि परतावं लागतं. अशात अशा पळून आलेल्या कपल्ससाठी एक मंदिर चांगलंच प्रसिद्ध आहे. कारण या मंदिरात पळून आलेल्या कपल्सना निवारा दिला जातो.

हिमाचल प्रदेश जगभरात आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय राज्य आहे. याच हिमाचल प्रदेशात शंगचूल महादेव मंदिर हे पळून आलेल्या जोडप्यांचं रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिमाचलमध्ये शांघड हे एक छोटसं गाव आहे. कुल्लूच्या सेंज व्हॅलीत हे गाव असून या गावाला महाभारत काळापासून ऐतिहासिक महत्व आहे.

(Image Credit : nativeplanet.com)

याच गावात हे शंगचूल महादेव मंदिर आहे. येथील खासियत म्हणजे जर कपल्स पळून येऊन या मंदिराच्या परिसरात पोहोचले तर ते इथे असेपर्यंत त्यांना कुणीही हात लावू शकत नाहीत. या मंदिराचा परिसर साधारण १०० गुंठे इतका आहे. कपल्स जर या परिसरात पोहोचले तर त्यांना शंगचूल महादेवाच्या चरणी आल्याचा मान मिळतो.

(Image Credit : patrika.com)

इथे पळून येणाऱ्या कपल्सना त्यांच्या समस्या नष्ट होईपर्यंत इथेच राहू दिलं जातं. त्यांची काळजी घेतली जाते. हे सगळं मंदिरातील पुजारी करतात. या गावाबाबत एक अशी मान्यता आहे की, अज्ञातवासाच्या काळात पांडव इथे आले होते. त्यावेळी  कौरव त्यांच्या मागे तिथे आले होते. पण त्यावेळी शंगचूल महादेवाने कौरवांना अडवले होते. तेव्हा कौरव परतले होते. 

(Image Credit : journeytoexplore.com)

तेव्हापासूनच समाजाने दूर केलेल्या लोकांचं किंवा प्रेमी युगुलांचं इथे रक्षण केलं जातं. त्यांना आश्रय दिला जातो. असे म्हणतात की, महादेव या जोडप्यांची रक्षा करतात. त्यांच्या समस्या सुटल्यावर ते कुठेही जाऊन राहू शकतात. पण काही अडचण असेल तर ती दूर होईपर्यंत तिथेच त्यांना राहता येतं.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके