शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!

By admin | Updated: February 16, 2016 03:15 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते

अहमदाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते; परंतु गुजरात सरकारला मात्र हे मान्य नाही असे दिसते. कारण सौराष्ट्रच्या जेतपूर गावातील अज्ञात पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला होता, असे या सरकारचे म्हणणे आहे.राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीने राजकोटसह इतर काही जिल्ह्यांच्या महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्तीसाठी अलीकडेच एक परीक्षा घेतली होती. या परीक्षेत गांधीजींना महात्मा ही उपाधी कुणी दिली होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ही परीक्षा देणारी एक परीक्षार्थी संध्या मारू हिने या प्रश्नाचे उत्तर रवींद्रनाथ टागोर असे दिले होते; परंतु हे उत्तर चुकीचे ठरवून तिचे गुण कमी करण्यात आले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असतानाच सौराष्ट्रातील एका पत्रकाराने त्याच्या निनावी पत्रात त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला होता, असा खुलासा परीक्षा आयोजन समितीतर्फे करण्यात आला. त्याच्या पुष्ट्यर्थ गांधीवादी नारायण देसाई यांच्या पुस्तकाचा हवालाही समितीने दिला. या गुणकपातीविरोधात संध्या मारू यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि वादाला तोंड फुटले. याचिकेत तीन प्रश्नांच्या उत्तराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अंतरिम उत्तर पत्रिकेत या प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत; परंतु अंतिम उत्तर पत्रिकेत मात्र चुकीची उत्तरे देण्यात आली असल्याचा याचिकाकर्तीचा दावा आहे. गांधी यांना महात्मा उपाधी कुणी दिली? या प्रश्नाचे अंतरिम उत्तरपत्रिकेतील उत्तर टागोर असे आहे; परंतु अंतिम उत्तरपत्रिकेत मात्र अज्ञात पत्रकाराचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तरही गंगाऐवजी ब्रह्मपुत्रा असे देण्यात आले असल्याचे संध्या मारू यांनी लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे यावर न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांनी मागितलेल्या खुलाशातही जिल्हा पंचायतने या अज्ञात पत्रकाराचाच उल्लेख केला. तेव्हा न्यायालयाने थेट जिल्हा पंचायतीचे वकील एच.एस. मनशॉ यांनाच या प्रश्नाला तुमचे उत्तर काय असेल? असा सवाल केला. वकिलांनी आपले उत्तर टागोरच राहील, कारण विद्यार्थ्यांना हेच शिकविले जाते, असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे. (वृत्तसंस्था)