शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!

By admin | Updated: February 16, 2016 03:15 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते

अहमदाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते; परंतु गुजरात सरकारला मात्र हे मान्य नाही असे दिसते. कारण सौराष्ट्रच्या जेतपूर गावातील अज्ञात पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला होता, असे या सरकारचे म्हणणे आहे.राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीने राजकोटसह इतर काही जिल्ह्यांच्या महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्तीसाठी अलीकडेच एक परीक्षा घेतली होती. या परीक्षेत गांधीजींना महात्मा ही उपाधी कुणी दिली होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ही परीक्षा देणारी एक परीक्षार्थी संध्या मारू हिने या प्रश्नाचे उत्तर रवींद्रनाथ टागोर असे दिले होते; परंतु हे उत्तर चुकीचे ठरवून तिचे गुण कमी करण्यात आले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असतानाच सौराष्ट्रातील एका पत्रकाराने त्याच्या निनावी पत्रात त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला होता, असा खुलासा परीक्षा आयोजन समितीतर्फे करण्यात आला. त्याच्या पुष्ट्यर्थ गांधीवादी नारायण देसाई यांच्या पुस्तकाचा हवालाही समितीने दिला. या गुणकपातीविरोधात संध्या मारू यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि वादाला तोंड फुटले. याचिकेत तीन प्रश्नांच्या उत्तराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अंतरिम उत्तर पत्रिकेत या प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत; परंतु अंतिम उत्तर पत्रिकेत मात्र चुकीची उत्तरे देण्यात आली असल्याचा याचिकाकर्तीचा दावा आहे. गांधी यांना महात्मा उपाधी कुणी दिली? या प्रश्नाचे अंतरिम उत्तरपत्रिकेतील उत्तर टागोर असे आहे; परंतु अंतिम उत्तरपत्रिकेत मात्र अज्ञात पत्रकाराचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तरही गंगाऐवजी ब्रह्मपुत्रा असे देण्यात आले असल्याचे संध्या मारू यांनी लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे यावर न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांनी मागितलेल्या खुलाशातही जिल्हा पंचायतने या अज्ञात पत्रकाराचाच उल्लेख केला. तेव्हा न्यायालयाने थेट जिल्हा पंचायतीचे वकील एच.एस. मनशॉ यांनाच या प्रश्नाला तुमचे उत्तर काय असेल? असा सवाल केला. वकिलांनी आपले उत्तर टागोरच राहील, कारण विद्यार्थ्यांना हेच शिकविले जाते, असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे. (वृत्तसंस्था)