शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

एका जिद्दीची कहाणी! 'लंडनच्या आजीबाईंची खानावळ'; वाचून डोळ्यात पाणी येईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 13:12 IST

नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं.

मुंबई - १९५० च्या दशकात घरची हलाखीची परिस्थिती आणि पदरी ५ मुली अन् विधवा म्हणून जीवनात आलेली निराशा अशा संघर्षमय जीवन जगत असलेल्या राधाबाई वनारसे, यवतमाळच्या रस्त्यावर भाजी विकण्याचं काम करत होत्या. अचानक त्यांच्या आयुष्यात इंग्लडहून आलेला व्यक्ती येतो, त्याच्याशी लग्न करुन राधाबाई बोटीने लंडनला जातात. येथून सुरु होतो राधाबाईंच्या आयुष्यातील खडतर प्रवास. 

नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं. लंडनला गेलेल्या राधाबाई यांचं जीवन सुरळीत सुरु असताना थोड्या आजाराच्या निमित्ताने त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. राधाबाईंचा संसार पुन्हा उघड्यावर आला. त्यातच घरातल्यांनी घराबाहेर काढले. 

ऐन हिवाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडलेल्या राधाबाई अनोळख्या या देशामध्ये सोबतीला कोणी आपलं माणूस नाही. बाहेर बर्फ पडत होता, हाताला दोन मुली, नववारी साडी नेसलेली बाई लंडनच्या रस्त्यावर एकटी सुन्न मनस्थितीत बसलेली होती. जीवनात पुढे काय करायचं? कसं जगायचं? मुलींना कसं जगवायचं? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात विचारांचे काहूर माजलं होतं. 

अशातच एक भला माणूस त्यांच्याजवळ येऊन विचारपूस करतो. इंग्रजी येत नसलेल्या राधाबाई कसाबसा त्याच्याशी संवाद साधतात. यामध्ये तो माणूस तिला विचारतो तुम्हाला काय जमतं? यावर तिने स्वयंपाक असं उत्तर दिल. तो माणूस राधाबाईला घरी घेऊन जातो. घरातील मोकळी जागा देऊन सांगतो स्वयंपाक करा. हळूहळू मराठमोळ्या आजीबाईच्या जेवणाची चव लोकांना येत जाते तसतसं आजीबाई वनारसे खानावळ लंडनमध्ये प्रसिद्ध होऊ लागते. 

लंडनमध्ये असणाऱ्या मराठी माणसांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचं काम आजीबाईच्या खानावळीतून होत असे. शिक्षणासाठी आणि कामासाठी वास्तव्य करणाऱ्या लोकांची खानावळीसाठी गर्दी होते. तिथून पुढचा प्रवास म्हणून आजीबाईंची खानावळ मोठ्या जागेत विस्तारते. अगदी पु.लपासून अत्रेपर्यंत अनेक जण लंडनला गेल्यानंतर आजीबाईंच्या खानावळीत जेवायला जात असे. आजीबाईंची खानावळ नावारुपाला आली. निरक्षर असणाऱ्या आजीबाईंचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. आजीबाईंचे जेव्हा निधन झालं त्यावेळी लंडनमध्ये त्यांच्या मालकीचे ५ फ्लॅट होते. त्यांच्या अंत्यविधीला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचे मेयर उपस्थित होते. अशा आजीबाईंची खरी कहानी ऐकून एका गोष्टीचं तात्पर्य लक्षात घ्यायला हवं जीवनात संघर्ष अनेक येतील. पण त्याच जिद्दीने पुढे जाण्याची धमक तुमच्यात असली तर तुमचं आयुष्यात यश नक्की मिळतं   

टॅग्स :LondonलंडनLondon Mayorलंडन महापौर