शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

कमाल! एका कलिंगडासाठी झालं होतं मोठं युद्ध, हजारो सैनिकांचा गेला होता जीव; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:14 IST

War for Watermelon : जगातली ही पहिली लढाई आहे जी केवळ एका फळासाठी लढली गेली होती. इतिहासात हे युद्ध 'मतीरे की राड' नावाने नोंदवलं आहे.

War for Watermelon : जगाच्या इतिहासात अनेक युद्ध प्रसिद्ध आहेत. यातील जास्तीत जास्त लढाया या दुसऱ्या राज्यांवर सत्ता स्थापन करणं यासाठी झाल्या. पण १६४४ मध्ये एक युद्ध केवळ एका कलिंगडासाठी झालं होतं. या युद्धात हजारो सैनिक मारले गेले होते. कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

जगातली ही पहिली लढाई आहे जी केवळ एका फळासाठी लढली गेली होती. इतिहासात हे युद्ध 'मतीरे की राड' नावाने नोंदवलं आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये कलिंगडाला मतीरा नावाने ओखळलं जातं आणि राडचा अर्थ लढाई होतो. आजपासून ३७६ वर्षाआधी १६४४ मध्ये हे अनोखं युद्ध झालं होतं. कलिंगडासाठी लढण्यात आलेली ही लढाई दोन राज्यांच्या लोकांमध्ये लढली गेली होती.

त्यावेळी बीकानेरच्या सीलवा गाव आणि नागौरच्या जाखणिया गावाच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही संस्थानांच्या शेवटच्या सीमेंवर ही गावं होती. बीकानेर संस्थानाच्या सीमेत एक कलिंगडाचं झाड लागलं होतं आणि त्याच झाडाला लागलेलं कलिंगड हे नागौर संस्थानाच्या सीमेत वाढलं होतं. हेच युद्धाचं कारण ठरलं.

सीलवा गावातील लोकांचं मत होतं की, झाड त्यांच्या सीमेत आहे त्यामुळे फळावरही त्यांचा अधिकार आहे. तेच नागौरमधील लोक म्हणत होते की, फळ त्यांच्य सीमेत आहे त्यामुळे ते त्यांचं आहे. या फळावरील अधिकारामुळे दोन संस्थांनामध्ये लढाई सुरू झाली आणि ही लढाई खूप वाढली.

सिंघवी सुखमलने नागौरच्या सेनेचं नेतृत्व केलं आणि रामचंद्र मुखियाने बीकानेरच्या सेनेचं नेतृत्व केलं. सर्वात मोठी बाब म्हणजे दोन्ही संस्थानांच्या राजांना या युद्धाबाबत कानोकान खबर नव्हती. बीकानेरचे राजा करणसिंह एका अभियानावर होते तर नागौरचे राजा राव अमरसिंह मुघल साम्राज्याची सेवा करत होते.

हे दोन्ही राजे मुघल साम्राज्याच्या भाग होते. जेव्हा या लढाईबाबत दोन्ही राजांना समजलं तेव्हा त्यांनी यात मुघल राजाला हस्तक्षेप करण्यास सांगितला. जोपर्यंत ही बाब मुघल शासकापर्यंत पोहोचली तोपर्यंत युद्धाला सुरूवात झाली होती. या युद्धात बीकानेर संस्थानाचा विजय झाला. असं सांगितलं जातं की या युद्धा दोन्हीकडील हजारो लोक मारले गेले होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स