शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

भारतातील 'या' राज्यातील काही गावांत स्त्रिया ब्लाऊजशिवायच नेसतात साडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:31 IST

भारत विविधतेने नटलेला देश आहे, असे अनेकदा म्हटले जाते. संपूर्ण देशभरात अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती, परंपरा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

(Image Creadit : rochakpost)

भारत विविधतेने नटलेला देश आहे, असे अनेकदा म्हटले जाते. संपूर्ण देशभरात अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती, परंपरा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. पण विविधता असली तरीही अनेक गोष्टींना देशाच्या पारंपारिक गोष्टी म्हणून ओळखलं जातं. त्यातीलच एक म्हणजे साडी. आधीपासूनच भारतामध्ये स्त्रिया साडी नेसतात. ती नेसण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही तिचा समावेश पारंपारिक पोशाखांमध्ये करण्यात येतो. साधारणतः साडी आणि तिच्यासोबत चोळी म्हणजेच ब्लाऊज हा पोशाख आहे. 

सध्या साडी आणि ब्लाऊजमध्ये अनेक वेगवेगळे ट्रेन्ड आढळून येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे ब्लाऊजची. साडी कितीही साधी असली आणि तिच्या भरजरीत ब्लाऊज घातला तर त्यामुळे एक वेगळा लूक तुम्हाला येतो. पण असं असलं तरीही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतातील एक राज्य असंही आहे. जिथं स्त्रिया साडीवर ब्लाऊज घालत नाहीत. ही पद्धत फार पूर्वपार चालत आली असून यापाठीमागे एक असं कारण दडलेलं आहे, जे ऐकून तुम्हाला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही.

सध्या देशभरात स्त्रिया सुरक्षित आहेत की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोज स्त्रियांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. अनेकदा वाढत्या अत्याचारांना सध्याची बदललेली परिस्थिती आणि स्त्रियांचे आधुनिक पोशाख यांनाच दोष दिला जातो. परंतु या गावात आधीपासूनच स्त्रिया ब्लाऊजशिवाय साडी नेसतात. हे गाव छत्तीसगढ राज्यातील आहे. या राज्यातील आदिवासी स्त्रिया फार पूर्वीपासून ब्लाऊज घालत नाहीत. या गावातील परंपरेनुसार स्त्रियांना ब्लाऊज घालण्याची परवानगी नाही. या परंपरेनुसार महिला स्वतःही ब्लाऊज घालत नाहीत आणि गावातील इतर स्त्रियांनाही ब्लाऊज घालू देत नाहीत. या भागात राहणारी लोकं अनेक वर्षांपासून या परंपरेचं पालन करत आहेत. 

(Image Creadit : Panjab kesari)

काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या आल्या होत्या की, या गावातील काही मुलींनी साडीवर ब्लाऊज घालण्यास सुरुवात केली होती. पण त्या मुलींवर गावकऱ्यांनी परंपरा मोडल्याचा आरोप लावला होता. आजही या गावातील वयोवृद्ध व्यक्ती ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या पद्धतीला गातीमार स्टाईल म्हटलं जातं. जवळपास एक हजार वर्षांपासून या गावातील महिला या परंपरेचं पालन करत आहेत. 

या गावातील महिलांचा असा समज आहे की, ब्लाऊजशिवाय साडी नेसल्याने काम करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे शेतात काम करणं आणि ओझी उचलणं देखील सोपं होतं. अनेक ठिकाणी जंगलात राहणाऱ्या आदिवासी स्त्रिया उन्हाळ्यात गरम होतं म्हणून ब्लाऊज घालणं टाळतात. तेच शहरांमध्ये साडीवर ब्लाऊज न घालणं ही फॅशन समजली जाते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWomenमहिला