शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धनत्रयोदशीला संस्कार भारती रांगोळीलाच प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:48 IST

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन रांगोळी काढण्याचा प्रत्येक गृहिणींचा हट्ट असतो.

ठळक मुद्दे संस्कार भारतीमध्ये अनेक एक्सपेरिमेंट करायला मिळतात. संस्कार भारती प्रसिद्ध असल्याने अनेक रांगोळी कलाकार संस्कार भारतीलाच जास्त महत्व देत आहेत.संस्कार भारतीमध्ये नवनवे रंग भरुन रांगोळी छान सजवली जाते. फुलांचाही वापर केला जातो.

घरात सुख, संपत्ती नांदण्यासाठी साजऱ्या करण्यात येणारा धनत्रयोदशी हा दिवाळीतील पहिला दिवस.  देशभर हा सण उत्साहात साजरा करतात. दिवाळीत घरासमोर छान रेखीव रांगोळी काढण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीपासून आपण रांगोळी काढायाला सुरुवात करतो. अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत प्रत्येकाच्या दारात रांगोळी पाहायला मिळतेच. प्रत्येकदिवशी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन रांगोळी काढण्याचा मानस प्रत्येक शहरातील कलाकारात असतो. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई शहरातही अनेक विविध संकल्पना साकारून रांगोळी काढली जाते. 

आम्ही तुम्हाला काही हटके रांगळोच्या डिझाईन्स देतोय, ज्या तुम्ही तुमच्या दारात अगदी सहज काढू शकाल.

धनत्रयोदशीला या शहरांमध्ये खासकरून संस्कार भारतीची रांगोळी काढतात. खरतर कोणत्याही सण-समारंभात संस्कार भारतीच रेखाटली जाते. शिवाय दिवाळीतही ठिपक्यांच्या रांगोळीपेक्षाही संस्कार भारतीचीच जास्त चलती आहे. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीलाही संस्कार भारती रेखाटली जाते. पुण्यातील आळेफाटा येथे राहणारा तेजस गुंजाळ म्हणतो की, 'आम्ही नेहमीच संस्कार भारती रांगोळी काढतो. धनत्रयोदशीपासून सायंकाळची रांगोळी काढली जाते. दरदिवशी आमची नवी संकल्पना असते. त्यामुळे धनत्रयोदशीला फक्त संस्कार भारतीच आम्ही काढतो.'

तर, मुंबईत राहणारा अभिषेक साटम म्हणतो की, 'आम्ही नेहमीच संस्कार भारतीची आरास करतो. त्यात नवनवे रंग भरुन रांगोळी छान सजवली जाते. फुलांचाही वापर केला जातो. संस्कार भारतीमध्ये अनेक एक्सपेरिमेंट करायला मिळतात. आपल्यातील सृजनात्मकतेचा वापर करून संस्कार भारती मी रेखाटण्याचा प्रयत्न करतो.'

एकूणच काय सध्या संस्कार भारतीची फार चलती आहे. पूर्वी ठिपक्यांची रांगोळी फार प्रसिद्ध होती. कोण किती जास्त ठिपक्यांची रांगोळी काढणार याची स्पर्धा पूर्वी असायची, आता संस्कार भारती प्रसिद्ध असल्याने अनेक रांगोळी कलाकार संस्कार भारतीलाच जास्त महत्व देत आहेत.

 

टॅग्स :diwaliदिवाळीrangoliरांगोळी