शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

रडताना डोळ्यातून अश्रुधारा का निघतात ? यामागे आहे रंजक गोष्ट, जाणून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:17 IST

काही जणांना खूप आनंद झाला, की त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात; पण बहुतांश जणांना केवळ रडताना अश्रू येतात. रडण्याचा, भावनांचा आणि अश्रूंचा संबंध कसा असतो, हे जाणून घेऊ या. रडताना अश्रू येण्यामागे शास्त्रीय कारण आहे.

डोळ्यांतून अश्रू (Tears) येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. डोळ्यांतून अश्रू येण्याचा आणि मनातल्या भावभावनांचा निकटचा संबंध असतो. कधी अतीव दुःखामुळे, तर कधी आनंदामुळे (Happiness) अश्रू येतात. मनाला एखाद्या गोष्टीमुळे, घटनेमुळे, कुणाच्या बोलण्यामुळे दुःख झालं तर डोळे पाणावतात. एखाद्या शारीरिक वेदनेमुळेही डोळ्यांत टचकन अश्रू येतात. काही जणांना खूप आनंद झाला, की त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात; पण बहुतांश जणांना केवळ रडताना अश्रू येतात. रडण्याचा, भावनांचा आणि अश्रूंचा संबंध कसा असतो, हे जाणून घेऊ या. रडताना अश्रू येण्यामागे शास्त्रीय कारण आहे.

अतीव दुःखामुळे, भावना दुखावल्यामुळे व्यक्तीला रडू येऊ शकतं. रडताना डोळ्यांतून अश्रू पाझरू लागतात. यामागे काही कारणं आहेत. जेव्हा आपण कोणत्याही भावनेच्या टोकाला पोहोचतो तेव्हा आपले डोळे भरून येतात. याचं कारण असं, की जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते, तेव्हा शरीरात काही विशिष्ट क्रिया होतात. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटला किंवा दुःख झाल्यास अशी क्रिया घडून येते. यामुळे शरीरातल्या हॉर्मोन्समध्ये (Hormones) अनेक बदल होतात. त्यात अॅड्रिनालिनच्या (Adrenaline) पातळीचाही समावेश असतो. हॉर्मोन्स बदलाचा आणि डोळ्यांचा संबंध असतो. या बदलामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात. बहुतांश भावना (Emotion) याच पद्धतीनं शरीरावर परिणाम करताना दिसतात. भावनांच्या आवेगामुळं रडू येणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

याशिवाय, कांद्यातल्या रसायनांमुळेही (Chemicals) डोळ्यांतून अश्रू येतात. या रसायनाला सीन-प्रोपेंथियल-एस-ऑक्साइड असं म्हटलं जातं. कांदा कापताना त्यातल्या रसायनांमुळे डोळ्यांतल्या अश्रू ग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येतात. कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येऊ नये, यासाठी कांदा कापण्याची पद्धत बदलावी.

याव्यतिरिक्त, डोळ्याला संसर्ग (Infection) किंवा अ‍ॅलर्जी झाल्यास डोळ्यातून पाणी येतं. या संसर्गाला वॉटरी आइज (Watery Eyes) असं संबोधलं जातं. डोळ्याच्या अनुषंगानं अन्य काही समस्या असल्यास डोळ्यातून पाणी येतं. त्याच प्रमाणे जोरदार वाऱ्यांमुळेही डोळ्यातून पाणी येतं; मात्र या दोन्ही बाबींपेक्षा मनाला आनंद झाल्यास किंवा तीव्र दुःख झाल्यास डोळ्यातून अश्रू येणं ही बाब तुलनेनं अधिकवेळा दिसून येते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके