शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 14:43 IST

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे.

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे. प्लास्टिकमुळे पृथ्वी संकटात सापडते आहे. त्यामुळेच वैज्ञानिक आणि लोक प्लास्टिकच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. अशातच एक असं प्रॉडक्ट समोर आलं आहे, ज्याने प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलचा वापर बंद होऊ शकतो. 

एका रिपोर्टनुसार, प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होण्यासाठी ४५० ते १००० हजार वर्षांचा वेळ लागू शकतो. जगभरातील लोक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने सगळीकडे प्लास्टिक बघायला मिळतं. प्लास्टिकमुळे समुद्री जीवही मरण पावत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून लोकांचा पब्लिक इव्हेंट्समध्ये सहभाग वाढला आहे. पण हे इव्हेंट्स संपल्यावरचा नजारा फारच वाइट असतो. रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये ९२०,००० प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला गेला. या बॉटल नष्ट व्हायला हजारो वर्ष लागतील. त्यानंतर स्टार्टअप Skipping Rock Lab ने एक कमालीचा आविष्कार केला.

या प्रॉडक्टचं नाव आहे Ooho, जे खाता येणारं पाणी आहे. म्हणजे पाण्याने भरलेला एक छोटा बॉल. तुम्ही हे खाऊन तुमची तहान भागवू शकता. या प्रॉडक्टमुळे मॅरेथॉनसारख्या पब्लिक इव्हेंट्समध्ये प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर कमी होऊ शकतो. हा खाता येणारा वॉटर पाउच Seawood (एक समुद्री झाड) पासून तयार करण्यात आला आहे. एकतर तुम्ही हा पाउच खाऊही शकता नाही तर फेकूही शकता. काही दिवसांनी या पाउचचं कव्हर आपोआप नष्ट होतं. 

यावेळी लंडन मॅरोथॉनमध्ये याचा वापर करण्यात आला. आणि यामुळे प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर ९२०,००० ऐवजी केवळ ७०४,००० बॉटल्सचा वापर झाला. या पाउचमुळे मॅरेथॉनमध्ये धावणे सुद्धा सोपे होते. महत्त्वाची बाब म्हणजे या पाउचचा वापर केवळ पाण्यासाठीच नाही तर सॉस किंवा ड्रिंक्ससाठीही केला जाऊ शकतो. 

हे प्रॉडक्ट लंडन स्टार्टअपने २०१३ मध्ये तयार केलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरातील ४० देशांमध्ये प्लास्टिकला पूर्णपणे बॅन करण्यात आलं आहे. पण याबाबतीत भारताची भूमिका जरा लवचिक आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी आहे तर काहींमध्ये नाही. 

टॅग्स :LondonलंडनWaterपाणीpollutionप्रदूषण