शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याच्या निर्मितीचे तंत्र शोधणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:02 IST

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पुर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा  कालावधी लागतो.

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो.  हेच प्लास्टिक आज माणसाच्या जीवनात सगळयात जास्त समस्या निर्माण करणारं ठरलं आहे.  संपूर्ण जग हे प्लास्टिकच्या वापरापासून  सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  तर एकिकडे भारतातील काही टक्के लोक प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून उपाय शोधत आहेत.  याचा फायदा देशाला सुद्धा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीयाबद्दल सांगणार आहोत. जो भारताचा प्लास्टीक मॅन ठरला आहे. 

या प्लास्टिक मॅनचे संपूर्ण नाव राजगोपालन वासूदेवन आहे. या माणसाने असा शोध लावला आहे. ज्याचा वापर करून प्लास्टीकच्या सहय्याने सुंदर आणि टिकाऊ रस्ते तयार करता येऊ शकतात. वासुदेवन मदुरै यूनिवर्सिटीतील Thiagarajar College Of Engineering मधिल रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.  प्लास्टिकचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी अनेक टेक्निक्स वापरल्या.  

त्यांच्या या शोधाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता यांना जातं. कारण त्यांनी पेटंट उपलब्ध करून दिले. ज्यामुळे अनेक भागात प्लास्टिकचा वापर करून चांगले रस्ते करण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरण सुद्धा या तंत्राचा वापर करत आहेत. या पध्दतीमुळे प्लास्टिकपासून तयार होत असलेला कचरा आणि रस्ते या दोन्ही समस्यांवर उपाय निघणार आहे. या टेक्निकचा वापर करून आत्तापर्यंत भारतात १ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात  आले आहेत. अजूनही अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं जात आहे.

२०१८ मध्ये भारत सरकारने वासुदेवन यांना या टेक्निकच्या शोधाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन स्नमानित केले होते.  वासुदेवन यांचा हा प्रकल्प विकत घेण्यासाठी जगभरातील अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण त्यांनी भारत सरकारकडे  हा शोध सुपूर्त केला.  सरकारकडून या तंत्राचा वापर करून अनेक चांगले रस्ते तयार करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPlastic banप्लॅस्टिक बंदी