शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 17:00 IST

ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात.

Trending and Viral News: कांद्याचे आणि लसणाच्या वाढत्या-कमी झालेल्या भावाच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. जास्तीत जास्त घरांमध्ये कांदा आणि लसूण खाल्ला जातो. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये यांचा वापर केला जातो. याने शरीराची इम्युनिटीही वाढते. इतके फायदे असूनही काही लोक कांदा आणि लसूण अजिबात खात नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. इतकंच काय तर ते कांदा आणि लसूण खरेदीही करत नाहीत.

ज्या गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते गाव बिहारच्या जहानाबादच्या जवळ आहे. हे दाव जहानाबाद जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नाव आहे त्रिलोकी बिगहा गाव. या गावात साधारण 30 ते 35 घरे आहे. या सगळ्याच घरामध्ये कांदा आणि लसूण खाण्यास सक्त मनाई आहे. येथील लोक कांदा-लसणाशिवाय जेवण करतात. 

त्रिलोकी बिगहा गावातील वयोवृद्ध लोक सांगतात की, साधारण 40 ते 45 वर्षाआधी येथील लोकांना कांदा आणि लसूण खाणं सोडलं होतं आणि या परंपरेचं पालन बऱ्याच वर्षापासून लोक करत आहेत. गावातील लोकांनुसार, गावात ठाकुरबाड़ीचं मंदिर (Thakurbadi Temple) आहे. हे मंदिर फार जुनं असून याच मंदिरामुळे गावातील लोकांनी कांदा आणि लसूण खाणं सोडलं आहे. 

लोकांची मान्यता आहे की, अनेक लोकांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या घरात अनेक समस्या बघायला मिळाल्या. या घटनांनंतर गावातील लोकांनी कांदा-लसूण खाणंच नाही तर बाजारातून विकत घेणंच बंद केलं आहे. केवळ लसूण आणि कांदाच नाही तर या गावात मांस खाणं आणि दारू पिणं यावरही सक्त मनाई आहे. इथे तुम्हाला कुणीही दारू पिताना दिसणार नाही आणि येथील लोकांनी मांस खाणंही सोडलं आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके