शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

'इथे' मुलीने पान खाल्ल म्हणजे जोडीदार निवडला, त्यानंतर राहतात मुलगा-मुलगी लिव्ह इनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:00 IST

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात दरवर्षी एक मेळा भरतो, ज्यामध्ये मुली त्यांच्या पसंतीचा नवरदेव निवडतात. पत्ता (Patta Mela) मेळा असं या मेळ्याचं नाव आहे.

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून मुलींना त्यांचा आवडता जोडीदार निवडण्याची परंपरा (Indian tradition) आहे. यासाठी पूर्वी स्वयंवर करण्यात यायचं, ज्यामध्ये मुलगी आपल्या आवडीच्या वराची निवड करायची. अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्वयंवराचा उल्लेख आढळतो. काळानुसार समाजात बदल झाला, त्यामुळे सर्वसामान्यांच्या राहणीमानातही बदल झाला. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा प्रथा आजही भारतीय समाजात वेगळ्या स्वरूपात जिवंत आहेत, ज्यात तरुण पुरुष आणि स्त्रिया स्वत:च्या इच्छेने जीवनसाथी निवडतात. याचीच झलक बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पाहायला मिळते. दरवर्षी इथे एक मेळा भरतो, ज्यामध्ये मुली त्यांच्या पसंतीचा नवरदेव निवडतात. पत्ता (Patta Mela) मेळा असं या मेळ्याचं नाव आहे.

]बर्‍याच दिवसांपासून पूर्णियाच्या बनमंखी येथील माळीणीया गावात अशी जत्रा भरते, जिथे मुलं आणि मुली त्यांच्या आवडीनुसार जोडीदार निवडतात. मुलीने पान खाल्लं तर नातं पक्कं झालं असं समजलं जातं. पत्ता जत्रा असं या जत्रेचं नाव आहे. माळीणीया गावात भरणारा हा आदिवासी समाजाचा खास मेळा आहे. आदिवासी तरुण-तरुणी येथे दूरदूरवरून येतात आणि या जत्रेत आपल्या आवडीचा मुलगा व मुलगी निवडतात.

मुलाला एखादी मुलगी आवडत असेल तर तो तिला पान खाण्यासाठी प्रपोज करतो. जर मुलीने पान खाल्लं तर ती तिची संमती मानली जाते. यानंतर मुलगा त्या मुलीला सर्वांच्या संमतीने आपल्या घरी घेऊन जातो, जिथे ते काही दिवस एकत्र घालवतात. या दरम्यान मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजून घेतात. त्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले जातात. यानंतर दोघांपैकी कोणीही लग्नास नकार दिल्यास आदिवासी समाजातील लोक त्यांना कठोर शिक्षा देतात आणि दंडही वसूल करतात.

या मेळाव्यात बांबूचा खास टॉवर बसवण्यात आला आहे. त्यावर चढून एक विशेष प्रकारची पूजा केली जाते. याशिवाय या मेळाव्यात आदिवासी तरुण-तरुणी ढोल-ताशांच्या तालावर नाचतात. एकमेकांवर माती टाकून आनंद साजरा करतात. या जत्रेत नेपाळमधूनही लोक येतात.

बैसाखी आणि शिरवा उत्सवानिमित्त दोन दिवस ही जत्रा भरते. ही जत्रा परिसरात खूप लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की ज्या काळात हिंदू समाजात पर्दा पद्धत प्रचलित होती. लोक मुलींना बाहेर पडू द्यायचे नाहीत, तेव्हापासून आदिवासी समाजात मोकळेपणा आणि स्वातंत्र्य होतं. मुलींना स्वतःच्या मनाप्रमाणे नवरा निवडण्याचा अधिकार होता. आजही हा पत्ता मेळा भरतो, ज्यात मनं जुळतात आणि ती नात्यात बदलतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके