शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

'इथे' मुलीने पान खाल्ल म्हणजे जोडीदार निवडला, त्यानंतर राहतात मुलगा-मुलगी लिव्ह इनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:00 IST

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात दरवर्षी एक मेळा भरतो, ज्यामध्ये मुली त्यांच्या पसंतीचा नवरदेव निवडतात. पत्ता (Patta Mela) मेळा असं या मेळ्याचं नाव आहे.

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून मुलींना त्यांचा आवडता जोडीदार निवडण्याची परंपरा (Indian tradition) आहे. यासाठी पूर्वी स्वयंवर करण्यात यायचं, ज्यामध्ये मुलगी आपल्या आवडीच्या वराची निवड करायची. अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्वयंवराचा उल्लेख आढळतो. काळानुसार समाजात बदल झाला, त्यामुळे सर्वसामान्यांच्या राहणीमानातही बदल झाला. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा प्रथा आजही भारतीय समाजात वेगळ्या स्वरूपात जिवंत आहेत, ज्यात तरुण पुरुष आणि स्त्रिया स्वत:च्या इच्छेने जीवनसाथी निवडतात. याचीच झलक बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पाहायला मिळते. दरवर्षी इथे एक मेळा भरतो, ज्यामध्ये मुली त्यांच्या पसंतीचा नवरदेव निवडतात. पत्ता (Patta Mela) मेळा असं या मेळ्याचं नाव आहे.

]बर्‍याच दिवसांपासून पूर्णियाच्या बनमंखी येथील माळीणीया गावात अशी जत्रा भरते, जिथे मुलं आणि मुली त्यांच्या आवडीनुसार जोडीदार निवडतात. मुलीने पान खाल्लं तर नातं पक्कं झालं असं समजलं जातं. पत्ता जत्रा असं या जत्रेचं नाव आहे. माळीणीया गावात भरणारा हा आदिवासी समाजाचा खास मेळा आहे. आदिवासी तरुण-तरुणी येथे दूरदूरवरून येतात आणि या जत्रेत आपल्या आवडीचा मुलगा व मुलगी निवडतात.

मुलाला एखादी मुलगी आवडत असेल तर तो तिला पान खाण्यासाठी प्रपोज करतो. जर मुलीने पान खाल्लं तर ती तिची संमती मानली जाते. यानंतर मुलगा त्या मुलीला सर्वांच्या संमतीने आपल्या घरी घेऊन जातो, जिथे ते काही दिवस एकत्र घालवतात. या दरम्यान मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजून घेतात. त्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले जातात. यानंतर दोघांपैकी कोणीही लग्नास नकार दिल्यास आदिवासी समाजातील लोक त्यांना कठोर शिक्षा देतात आणि दंडही वसूल करतात.

या मेळाव्यात बांबूचा खास टॉवर बसवण्यात आला आहे. त्यावर चढून एक विशेष प्रकारची पूजा केली जाते. याशिवाय या मेळाव्यात आदिवासी तरुण-तरुणी ढोल-ताशांच्या तालावर नाचतात. एकमेकांवर माती टाकून आनंद साजरा करतात. या जत्रेत नेपाळमधूनही लोक येतात.

बैसाखी आणि शिरवा उत्सवानिमित्त दोन दिवस ही जत्रा भरते. ही जत्रा परिसरात खूप लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की ज्या काळात हिंदू समाजात पर्दा पद्धत प्रचलित होती. लोक मुलींना बाहेर पडू द्यायचे नाहीत, तेव्हापासून आदिवासी समाजात मोकळेपणा आणि स्वातंत्र्य होतं. मुलींना स्वतःच्या मनाप्रमाणे नवरा निवडण्याचा अधिकार होता. आजही हा पत्ता मेळा भरतो, ज्यात मनं जुळतात आणि ती नात्यात बदलतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके