शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

२ बायका फजिती ऐका! 3 दिवस एकीचे तर ४ दिवस दुसरीचे; सांमजस्याने टळला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:27 IST

कौटुंबिक न्यायालयात सध्या या प्रकरणाची भलतीच चर्चा आहे. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी असं वकील म्हणतायेत

आजच्या काळात नाती जपणे, ती सांभाळणे एका आव्हानासारखे आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेमुळे वकीलही हैराण झाले. जेव्हा वादी-प्रतिवादी दोघेही तोडगा काढून अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टात आले. २ पत्नी आणि १ पती यांच्यात सुरू असलेल्या वादातून घटस्फोटापर्यंत हे प्रकरण पोहचले. लखनौच्या कौटुंबिक न्यायालयात याचिकेची सुनावणी सुरू आहे. 

परंतु अचानक एकेदिवशी वादी-प्रतिवादी यांनी तोडगा काढला आणि तडजोड करत याचिका मागे घेण्यासाठी अर्ज केला. सामंजस्य कराराप्रमाणे ३ दिवस पती एका पत्नीकडे तर उरलेले ४ दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. जर वाटले तर सण-उत्सवाला एकमेकांना भेटतील. कुणीही भविष्यात कुणाविरोधात याचिका दाखल करणार नाहीत. तक्रार करणार नाहीत असा तोडगा तिघांमध्ये ठरला आहे. आई वडिलांच्या पसंतीने पहिले लग्न तर दुसरा केला प्रेमविवाह

कौटुंबिक न्यायालयात सध्या या प्रकरणाची भलतीच चर्चा आहे. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी असं वकील म्हणतायेत. शहरातील एका पॉश परिसरात राहणाऱ्या युवकाचे लग्न २००९ मध्ये आई वडिलांच्या मर्जीनुसार झाले होते. त्यातून या युवकाला २ मुले आहेत. २०१६ रोजी हे जोडपे वेगळे झाले. युवकाने प्रेमविवाह केला त्यानंतर दोघांनी मिळून पहिल्या पत्नीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला. दुसऱ्या पत्नीपासून युवकाला एक मुलगा आहे. २०१८ मध्ये हे प्रकरण सुनावणीस आले. 

कोरोना काळामुळे सुनावणी पुढे गेली. कोरोनानंतर जेव्हा दोन्ही पक्षकार एक सांमजस्य करार घेऊन कोर्टात पोहचले. त्याठिकाणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यावर २८ मार्च रोजी कोर्टाने याचिका निकाली काढली. सांमजस्य करारानुसार, बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी पती पहिल्या पत्नीसोबत राहील. त्यानंतर उर्वरित ४ दिवस तो दुसऱ्या पत्नीसोबत असेल. त्याचसोबत सण उत्सवात अथवा कुठल्या अन्य कार्यक्रमास कुठल्याही एका पत्नीसोबत तो हजर राहील. त्यावर दोघींपैकी कुणाचाही आक्षेप नसेल. 

नवऱ्याच्या संपत्तीवर दोघींचा समान हक्क असेल. पहिल्या पत्नीच्या पालनपोषणासाठी १५ हजार रुपये दरमहिना पतीला द्यावे लागतील. या सर्व अटींचा स्वीकार करून दोन्ही पक्षकारांनी याचिका मागे घेण्यासाठी अर्ज केला. भारतीय दंड संहिता कलम ४९४ अंतर्गत हिंदू विवाह अधिनियम जर पत्नी किंवा पती जिवंत असेपर्यंत दुसरा विवाह अमान्य आहे. जर कुणी या कायद्याचे उल्लंघन केले तर त्याला १-७ वर्ष जेल आणि दंडही भरावा लागतो.