शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

लग्नानंतरची एक अशी परंपरा ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:33 IST

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही.

Marriage Rituals : लग्न म्हटलं की, वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही रिवाज लग्नाआधी तर काही लग्नानंतर केले जातात. कुठे लग्नानंतर नवरी कपडे घालत नाही तर कुठे पूर्ण परिवार नवरदेवाचे कपडे फाडतात. तर कुठे नवरदेवाचं स्वागत फुलांच्या हाराने नाही तर टोमॅटोने केलं जातं. आज लग्नाच्या अशात एका रिवाजाबाबत जाणून घेणार आहोत.

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही. यादरम्यान पती-पत्नी ऐकमेकांशी बोलूही शकत नाही. इतकंच नाही तर त्यांना एक आठवडा दूर ठेवलं जातं.  हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटातील पिणी गावात आजही ही प्रथा पाळली जाते. तसेच नवरदेवाला सुद्धा काही नियमांचं पालन करावं लागतं.

नवरदेवासाठी काय असतात नियम?

हिमाचलच्या पिणी गावात लग्नानंतर केवळ नवरी विना कपड्यांची राहते. पण यादरम्यान नवरी केवळ उलनचे पट्टे घालू शकते. या दिवसात पुरूषांनाही काही नियमांचं पालन करावं लागतं. पुरूष या दिवसात मद्यसेवन करत नाहीत. असं मानलं जातं की, जर नवरी-नवरदेवाने या नियमांचं पालन केलं तर त्यांना सौभाग्य मिळतं.

नवरीची आई करते अजब प्रथा

छत्तीसगढमध्ये लग्नासंबंधी एक अजब प्रथा पाळली जाते. छत्तीसगढच्या कवर्धा जिल्ह्यात बॅगा आदिवासी समाजात लग्नादरम्यान नवरीची आई नवरदेवाला दारू पाजून रिवाजाची सुरूवात करते. त्यानंतर पूर्ण परिवार सोबत बसून दारू पितात. इथे नवरीही नवरदेवाला दारू देते. त्यानंतर लग्नाचा आनंद साजरा केला जातो. यांच्यात आणखी एक चांगली बाब म्हणजे या समाजात हुंडा अजिबात घेतला जात नाही.

सोबत राहिल्यावर एक वर्षाने मिळते लग्नाची परवानगी

काही आदिवासी समाजांमध्ये नवविवाहित जोडप्याला कुणासोबतच बोलण्यास मनाई असते. या समाजात नव्या जोडप्याला एका गुप्त ठिकाणी पाठवलं जातं. यादरम्यान ते एकमेकाशिवाय दुसऱ्या कुणाच सोबत बोलू शकत नाहीत. एक वर्ष सोबत राहिल्यानंतर वयोवृद्ध लोक त्यांचं लग्न वैध ठरवतात. त्यानंतरच लग्नाचा आनंद साजरा केला जातो.

फाडतात नवरदेवाचे कपडे

सिंधी समाजात सांठ किंवा वनवासाचा रिवाज करताना नवरी आणि नवरदेवाच्या पायात एक घुंगरू बांधलं जातं. त्यानंतर काही महिला नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर तेल टाकतात. यानंतर दोघांनाही नवीन शूज देऊन पायाने एक मातीचा दिवा तोडावा लागतो. यानंतर सगळे मिळून नवरदेवाचे कपडे फाडतात. असं मानलं जातं की, असं करून वाईट शक्ती निघून जातात आणि लग्नात सगळं काही ठीक होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके