शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरची एक अशी परंपरा ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:33 IST

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही.

Marriage Rituals : लग्न म्हटलं की, वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही रिवाज लग्नाआधी तर काही लग्नानंतर केले जातात. कुठे लग्नानंतर नवरी कपडे घालत नाही तर कुठे पूर्ण परिवार नवरदेवाचे कपडे फाडतात. तर कुठे नवरदेवाचं स्वागत फुलांच्या हाराने नाही तर टोमॅटोने केलं जातं. आज लग्नाच्या अशात एका रिवाजाबाबत जाणून घेणार आहोत.

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही. यादरम्यान पती-पत्नी ऐकमेकांशी बोलूही शकत नाही. इतकंच नाही तर त्यांना एक आठवडा दूर ठेवलं जातं.  हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटातील पिणी गावात आजही ही प्रथा पाळली जाते. तसेच नवरदेवाला सुद्धा काही नियमांचं पालन करावं लागतं.

नवरदेवासाठी काय असतात नियम?

हिमाचलच्या पिणी गावात लग्नानंतर केवळ नवरी विना कपड्यांची राहते. पण यादरम्यान नवरी केवळ उलनचे पट्टे घालू शकते. या दिवसात पुरूषांनाही काही नियमांचं पालन करावं लागतं. पुरूष या दिवसात मद्यसेवन करत नाहीत. असं मानलं जातं की, जर नवरी-नवरदेवाने या नियमांचं पालन केलं तर त्यांना सौभाग्य मिळतं.

नवरीची आई करते अजब प्रथा

छत्तीसगढमध्ये लग्नासंबंधी एक अजब प्रथा पाळली जाते. छत्तीसगढच्या कवर्धा जिल्ह्यात बॅगा आदिवासी समाजात लग्नादरम्यान नवरीची आई नवरदेवाला दारू पाजून रिवाजाची सुरूवात करते. त्यानंतर पूर्ण परिवार सोबत बसून दारू पितात. इथे नवरीही नवरदेवाला दारू देते. त्यानंतर लग्नाचा आनंद साजरा केला जातो. यांच्यात आणखी एक चांगली बाब म्हणजे या समाजात हुंडा अजिबात घेतला जात नाही.

सोबत राहिल्यावर एक वर्षाने मिळते लग्नाची परवानगी

काही आदिवासी समाजांमध्ये नवविवाहित जोडप्याला कुणासोबतच बोलण्यास मनाई असते. या समाजात नव्या जोडप्याला एका गुप्त ठिकाणी पाठवलं जातं. यादरम्यान ते एकमेकाशिवाय दुसऱ्या कुणाच सोबत बोलू शकत नाहीत. एक वर्ष सोबत राहिल्यानंतर वयोवृद्ध लोक त्यांचं लग्न वैध ठरवतात. त्यानंतरच लग्नाचा आनंद साजरा केला जातो.

फाडतात नवरदेवाचे कपडे

सिंधी समाजात सांठ किंवा वनवासाचा रिवाज करताना नवरी आणि नवरदेवाच्या पायात एक घुंगरू बांधलं जातं. त्यानंतर काही महिला नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर तेल टाकतात. यानंतर दोघांनाही नवीन शूज देऊन पायाने एक मातीचा दिवा तोडावा लागतो. यानंतर सगळे मिळून नवरदेवाचे कपडे फाडतात. असं मानलं जातं की, असं करून वाईट शक्ती निघून जातात आणि लग्नात सगळं काही ठीक होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके