शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लग्नानंतरची एक अशी परंपरा ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:33 IST

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही.

Marriage Rituals : लग्न म्हटलं की, वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही रिवाज लग्नाआधी तर काही लग्नानंतर केले जातात. कुठे लग्नानंतर नवरी कपडे घालत नाही तर कुठे पूर्ण परिवार नवरदेवाचे कपडे फाडतात. तर कुठे नवरदेवाचं स्वागत फुलांच्या हाराने नाही तर टोमॅटोने केलं जातं. आज लग्नाच्या अशात एका रिवाजाबाबत जाणून घेणार आहोत.

आज आम्ही अशाच काही परंपरांबाबत सांगणार आहोत. आधी भारतातील अशा गावाबाबत सांगतो जिथे लग्नानंतर एक आठवडा नवीन नवरी कपडेच घालत नाही. यादरम्यान पती-पत्नी ऐकमेकांशी बोलूही शकत नाही. इतकंच नाही तर त्यांना एक आठवडा दूर ठेवलं जातं.  हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटातील पिणी गावात आजही ही प्रथा पाळली जाते. तसेच नवरदेवाला सुद्धा काही नियमांचं पालन करावं लागतं.

नवरदेवासाठी काय असतात नियम?

हिमाचलच्या पिणी गावात लग्नानंतर केवळ नवरी विना कपड्यांची राहते. पण यादरम्यान नवरी केवळ उलनचे पट्टे घालू शकते. या दिवसात पुरूषांनाही काही नियमांचं पालन करावं लागतं. पुरूष या दिवसात मद्यसेवन करत नाहीत. असं मानलं जातं की, जर नवरी-नवरदेवाने या नियमांचं पालन केलं तर त्यांना सौभाग्य मिळतं.

नवरीची आई करते अजब प्रथा

छत्तीसगढमध्ये लग्नासंबंधी एक अजब प्रथा पाळली जाते. छत्तीसगढच्या कवर्धा जिल्ह्यात बॅगा आदिवासी समाजात लग्नादरम्यान नवरीची आई नवरदेवाला दारू पाजून रिवाजाची सुरूवात करते. त्यानंतर पूर्ण परिवार सोबत बसून दारू पितात. इथे नवरीही नवरदेवाला दारू देते. त्यानंतर लग्नाचा आनंद साजरा केला जातो. यांच्यात आणखी एक चांगली बाब म्हणजे या समाजात हुंडा अजिबात घेतला जात नाही.

सोबत राहिल्यावर एक वर्षाने मिळते लग्नाची परवानगी

काही आदिवासी समाजांमध्ये नवविवाहित जोडप्याला कुणासोबतच बोलण्यास मनाई असते. या समाजात नव्या जोडप्याला एका गुप्त ठिकाणी पाठवलं जातं. यादरम्यान ते एकमेकाशिवाय दुसऱ्या कुणाच सोबत बोलू शकत नाहीत. एक वर्ष सोबत राहिल्यानंतर वयोवृद्ध लोक त्यांचं लग्न वैध ठरवतात. त्यानंतरच लग्नाचा आनंद साजरा केला जातो.

फाडतात नवरदेवाचे कपडे

सिंधी समाजात सांठ किंवा वनवासाचा रिवाज करताना नवरी आणि नवरदेवाच्या पायात एक घुंगरू बांधलं जातं. त्यानंतर काही महिला नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर तेल टाकतात. यानंतर दोघांनाही नवीन शूज देऊन पायाने एक मातीचा दिवा तोडावा लागतो. यानंतर सगळे मिळून नवरदेवाचे कपडे फाडतात. असं मानलं जातं की, असं करून वाईट शक्ती निघून जातात आणि लग्नात सगळं काही ठीक होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके