शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

केरळच्या या गावात आहेत ४०० पेक्षा अधिक जुळी मुले, रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:10 IST

हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे.

जगभरात अनेक अजब घटना घडत असतात. ज्या देश-विदेशातही चर्चेत असतात. या घटना इतक्या अनोख्या असतात की, त्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. अशीच एक अनोखी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक असं ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त जुळी मुले जन्माला येतात.

हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे. अनेकदा या गावातील जुळ्या मुलांना बघण्यासाठी दुरदुरून लोक येतात. गावात जास्तीत जास्त परिवारात जुळे मुलेच जन्माला येतात. पण असं कसं होतं? याचा शोध घेण्यासाठी अनेकदा वैज्ञानिकांच्या टीम या गावात आल्या. पण ते यावरून पडदा उठवू शकले नाहीत. (हे पण वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....)

येथील स्थानिक लोकांचं मत आहे की, या गावावर देवाची विशेष कृपा आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त मुलं जुळी जन्माला येतात. गेल्या ५० वर्षात या गावात साधारण ३०० पेक्षाही जास्त जुळ्या बाळांनी जन्म घेतला. ज्याची चर्चा आजही देश-विदेशात होते. (हे पण वाचा : बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या)

जर तुम्ही कोडिन्ही गावात गेलात तर तुम्ही भेट मोठ्या प्रमाणात जुळ्या लोकांशी होते. काही अंदाजांनुसार या गावात साधारण ४०० जुळे लोक राहतात. या रहस्यमय गोष्टीवरून पडदा उठवण्यासाठी २०१६ मध्ये या गावात एक टीम आली होती. त्यांनी गावातील जुळ्या लोकांचे सॅम्पल्स घेतले.

पण रिसर्चमधूनही ठोस असा काही निष्कर्ष निघाला नाही. अनेक लोक म्हणाले की, या गावाच्या हवा-पाण्यात असं काही असेल ज्यामुळे इथे जास्त जुळी मुलं जन्माला येतात. 

इतकंच नाही तर काही वैज्ञानिकांनी इथे राहणाऱ्या लोकांच्या खाण्या-पिण्याचा आणि राहणीमानाचाही अभ्यास केला. त्यानंतरही त्यांच्या हाती काही लागलं नाही. गावात इतके जुळे मुलं का जन्माला येतात हे आजही रहस्य बनून आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सKeralaकेरळ