शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 13:31 IST

महत्वाची बाब म्हणजे त्यांचं स्वत:चं घर आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार रूपये सुद्धा वाहून गेले. तरी सुद्धा त्या काही अपघात टाळण्यासाठी तब्बल सात तास मॅनहोलवर उभ्या होत्या.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. सगळीकडे पाणी भरलं गेलंय. याचे कितीतरी व्हिडडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. यात एका महिलेचाही व्हिडीओ आहे. ही महिला रस्त्यावरील मॅनहोलजवळ उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून अपघात होऊ नये. भर पावसात महिलेने केलेल्या या कामासाठी त्याचं सोशल मीडिया कौतुक केलं जात आहे.  महत्वाची बाब म्हणजे त्यांचं स्वत:चं घर आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार रूपये सुद्धा वाहून गेले. आता त्यांना मुलींच्या शिक्षणाची चिंता लागली आहे.

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी Bhayander Gudipadva Utsav फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला. त्यात दावा करण्यात आला होता की, 'हा व्हिडीओ माटुंगा वेस्टच्या तुलसी पाइप रोडा आहे. या महिलेने साचलेले पाणी जावं म्हणून आधी मॅनहोल उघडलं आणि नंतर ५ तास त्याजवळ उभी राहून लोकांना मार्ग दाखवत आहेत'. आधी या महिलेची काहीच माहिती समोर आली नव्हती. पण आता त्यांची ओळख पटली आहे.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं नाव आहे कांता मारुती कालन. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या तुलसी पाईप रोडवर फुटपाथवर राहतात. रस्त्यावर फुले विकून त्या घर चालवतात. कांता यांना एकूण ८ मुलं-मुली. त्यातील सहा मुलांची लग्ने झालीत. आता त्या आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या जानकी आणि तमिलश्री या दोन मुलींबरोबर राहतात. पती आजारी असून ते वेगळे राहतात. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या जेव्हा मॅनहोलजवळ सात तास उभे राहून, पाणी घरी परतल्या तेव्हा त्यांना 'घर' वाहून गेलेलं दिसलं. इतकेच नाही तर दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी साठवलेले दहा हजार रुपयेही घरासोबत वाहून गेले.

मॅनहोलचं झाकण उघडून त्यांनी साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली. इतकेच नाही तर मॅनहोलमध्ये पडू नये म्हणून तिथे सात तास उभ्या राहिल्या. त्यांच्या या समाजकार्यासाठी त्यांचं सोशल मीडियातून कौतुक होतंय. पण संतापजनक बाब म्हणजे मुंबई महापालिकेला याची काही गरजही वाटली नाही. मुंबई महापालिकेने उलट त्यांना 'आमच्या परवानगीविना मॅनहोलचे झाकण का उघडले' अशी विचारणा केली. 

त्यांनी सात मॅनहोलजवळ उभे राहून अनेकांचे प्राण तर वाचवलेच. सोबतच प्रशासनाचं काम स्वत: करत पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. मात्र, आता मुलींच्या शिक्षणाचे पैसे वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणाची चिंता कांताबाई यांना लागली आहे. त्यांचा या कामासाठी त्यांना सलाम! 

टॅग्स :MumbaiमुंबईSocial Viralसोशल व्हायरलMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका