शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! 'या' गावाचं किचन भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात; जाणून घ्या, नेमकं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:27 IST

देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल.

भौगोलिक स्थिती पाहता देशातील काही गावांना शेवटचं गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. भारतातील उत्तराखंडपासून (Uttarakhand) पुढे गेल्यास ईशान्य भारतात (North East) अशी अनेक गावं आहेत. या गावांबद्दल अनेकांनी ऐकलंही असेल. पण देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल. पण दोन देशांच्या सीमेवर हे गाव असल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भारतातलं शेवटचं गाव

भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमेवरील लोंगवा गाव (Longwa Village) भौगोलिकदृष्ट्या सीमेवर आहे. त्यामुळे घराघरांमध्ये भारत-म्यानमारदरम्यान सीमा विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. इथे एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची (Passport) आवश्यकता भासत नाही. लोंगवा हे गाव नागालँडच्या मोन जिल्ह्यात येतं. दोन देशांत या गावाची अर्धी-अर्धी वाटणी केली गेली आहे. या गावाला भारताचं शेवटचं गाव म्हणूनही संबोधलं जातं.

किचन भारतात तर बेडरूम म्यानमारमध्ये 

इतर गावांप्रमाणे लोंगवा या गावाने त्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओळख कायम ठेवली आहे. या गावातील लोक भारतात जेवण करतात आणि झोपण्यासाठी मात्र ते दुसऱ्या देशात जात असल्याचं बोललं जातं. यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमारेषा गेल्यामुळे अनेक लोकांचं किचन भारतात आहे. तर त्यांचे बेडरूम म्यानमारमध्ये येतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, गावचा प्रमुख हा येथील राजा असतो. त्याला ‘अंघ’ असं संबोधलं जातं. जर अंघच्या घरात असाल तर एकाच वेळी तुम्ही म्यानमार व भारतात असल्याचं मानलं जातं. 

गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व 

या गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतातील काही लोक शेती करण्यासाठी म्यानमारमध्ये जातात. तर काही म्यानमारमधील लोक शेती करण्यासाठी भारतात येतात. गावची प्रमुख व्यक्ती एखाद्या राजाप्रमाणे असते. या राजाला एक-दोन नव्हे अनेक पत्नी असू शकतात. या गावतील प्रमुखाचं नागालँडसह अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमध्ये 70 पेक्षा अधिक गावांत वर्चस्व आहे. याचाच अर्थ या गावच्या प्रमुखाचा आदेश दूरपर्यंत लागू असतो. या प्रमुखाला खूप मान, सन्मान दिला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतMyanmarम्यानमार