शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

ऐकावं ते नवलच! 'या' गावाचं किचन भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात; जाणून घ्या, नेमकं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:27 IST

देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल.

भौगोलिक स्थिती पाहता देशातील काही गावांना शेवटचं गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. भारतातील उत्तराखंडपासून (Uttarakhand) पुढे गेल्यास ईशान्य भारतात (North East) अशी अनेक गावं आहेत. या गावांबद्दल अनेकांनी ऐकलंही असेल. पण देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल. पण दोन देशांच्या सीमेवर हे गाव असल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भारतातलं शेवटचं गाव

भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमेवरील लोंगवा गाव (Longwa Village) भौगोलिकदृष्ट्या सीमेवर आहे. त्यामुळे घराघरांमध्ये भारत-म्यानमारदरम्यान सीमा विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. इथे एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची (Passport) आवश्यकता भासत नाही. लोंगवा हे गाव नागालँडच्या मोन जिल्ह्यात येतं. दोन देशांत या गावाची अर्धी-अर्धी वाटणी केली गेली आहे. या गावाला भारताचं शेवटचं गाव म्हणूनही संबोधलं जातं.

किचन भारतात तर बेडरूम म्यानमारमध्ये 

इतर गावांप्रमाणे लोंगवा या गावाने त्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओळख कायम ठेवली आहे. या गावातील लोक भारतात जेवण करतात आणि झोपण्यासाठी मात्र ते दुसऱ्या देशात जात असल्याचं बोललं जातं. यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमारेषा गेल्यामुळे अनेक लोकांचं किचन भारतात आहे. तर त्यांचे बेडरूम म्यानमारमध्ये येतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, गावचा प्रमुख हा येथील राजा असतो. त्याला ‘अंघ’ असं संबोधलं जातं. जर अंघच्या घरात असाल तर एकाच वेळी तुम्ही म्यानमार व भारतात असल्याचं मानलं जातं. 

गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व 

या गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतातील काही लोक शेती करण्यासाठी म्यानमारमध्ये जातात. तर काही म्यानमारमधील लोक शेती करण्यासाठी भारतात येतात. गावची प्रमुख व्यक्ती एखाद्या राजाप्रमाणे असते. या राजाला एक-दोन नव्हे अनेक पत्नी असू शकतात. या गावतील प्रमुखाचं नागालँडसह अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमध्ये 70 पेक्षा अधिक गावांत वर्चस्व आहे. याचाच अर्थ या गावच्या प्रमुखाचा आदेश दूरपर्यंत लागू असतो. या प्रमुखाला खूप मान, सन्मान दिला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतMyanmarम्यानमार