शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

ऐकावं ते नवलच! 'या' गावाचं किचन भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात; जाणून घ्या, नेमकं कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:27 IST

देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल.

भौगोलिक स्थिती पाहता देशातील काही गावांना शेवटचं गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. भारतातील उत्तराखंडपासून (Uttarakhand) पुढे गेल्यास ईशान्य भारतात (North East) अशी अनेक गावं आहेत. या गावांबद्दल अनेकांनी ऐकलंही असेल. पण देशात एक असं गाव आहे जिथे किचन भारतात आहे आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल. पण दोन देशांच्या सीमेवर हे गाव असल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भारतातलं शेवटचं गाव

भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमेवरील लोंगवा गाव (Longwa Village) भौगोलिकदृष्ट्या सीमेवर आहे. त्यामुळे घराघरांमध्ये भारत-म्यानमारदरम्यान सीमा विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. इथे एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची (Passport) आवश्यकता भासत नाही. लोंगवा हे गाव नागालँडच्या मोन जिल्ह्यात येतं. दोन देशांत या गावाची अर्धी-अर्धी वाटणी केली गेली आहे. या गावाला भारताचं शेवटचं गाव म्हणूनही संबोधलं जातं.

किचन भारतात तर बेडरूम म्यानमारमध्ये 

इतर गावांप्रमाणे लोंगवा या गावाने त्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओळख कायम ठेवली आहे. या गावातील लोक भारतात जेवण करतात आणि झोपण्यासाठी मात्र ते दुसऱ्या देशात जात असल्याचं बोललं जातं. यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमारेषा गेल्यामुळे अनेक लोकांचं किचन भारतात आहे. तर त्यांचे बेडरूम म्यानमारमध्ये येतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, गावचा प्रमुख हा येथील राजा असतो. त्याला ‘अंघ’ असं संबोधलं जातं. जर अंघच्या घरात असाल तर एकाच वेळी तुम्ही म्यानमार व भारतात असल्याचं मानलं जातं. 

गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व 

या गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतातील काही लोक शेती करण्यासाठी म्यानमारमध्ये जातात. तर काही म्यानमारमधील लोक शेती करण्यासाठी भारतात येतात. गावची प्रमुख व्यक्ती एखाद्या राजाप्रमाणे असते. या राजाला एक-दोन नव्हे अनेक पत्नी असू शकतात. या गावतील प्रमुखाचं नागालँडसह अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमध्ये 70 पेक्षा अधिक गावांत वर्चस्व आहे. याचाच अर्थ या गावच्या प्रमुखाचा आदेश दूरपर्यंत लागू असतो. या प्रमुखाला खूप मान, सन्मान दिला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतMyanmarम्यानमार