शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अडीच वर्षापासून बेपत्ता व्यक्तीला स्कॉर्पिओ बक्षिस मिळाली; कंपनीनं कुटुंबाला पत्र पाठवलं

By प्रविण मरगळे | Updated: December 15, 2020 11:58 IST

या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला.

...याला नशीब म्हणायचं की आणखी काय, जो व्यक्ती गेल्या अडीच वर्षापासून घरातून बेपत्ता होता, त्याच्या नावावर बक्षिस म्हणून महिंद्रा स्कॉर्पियो लागली आहे. बेपत्ता व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही परंतु तो जिवंत असल्याचा पुरावा कुटुंबाला मिळाला. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

सोलन जिल्ह्यातील ग्राम पंचायत पलोगच्या नेर गावातून बेपत्ता असणाऱ्या पवन कुमार यांच्या घरी औषध कंपनीकडून एक पत्र मिळालं, हे पत्र वाचून बेपत्ता मुलाच्या आई-वडिलांना पुन्हा आस लागली आहे. पवन कुमारने एका औषध कंपनीतून औषध खरेदी केलं होतं, कंपनीकडून मिळालेल्या कुपनमध्ये पवन कुमारला महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली.

पवन कुमार यांचे वडील नंदलाल शर्मा म्हणाले की, जवळपास अडीच  वर्षापूर्वी पवन कुमार घरात संध्याकाळी परततो असं सांगून निघून गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. त्यादिवसापासून पवन कुमार घरातून बेपत्ता आहे. पवन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. काही दिवसांपूर्वी औषध कंपनीकडून पवन कुमार यांच्या घराच्या पत्त्यावर एक पत्र आलं, हे पत्र वाचून आई-वडिलांना मोठा आनंद झाला.

या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला. कुटुंबाने कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, पवन कुमार यांनी अडीच महिन्यांपूर्वी औषधं खरेदी केली होती. त्यावेळी मिळालेल्या कुपनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली. पवन कुमार यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर बक्षिस कंपनीकडून मिळणार आहे.

दरम्यान, औषध कंपनीकडून आलेल्या पत्रानंतर पवन कुमार यांचा शोध घेण्यात मदत मिळणार आहे, संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून, लवकरात लवकर पवन कुमार यांचा ठावठिकाणा सापडण्यात यश मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे डीएसपी प्रताप सिंह यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMissingबेपत्ता होणं