शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: १८ वर्षापूर्वी ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले ‘तो’ पुन्हा घरी जिवंत परतला; मुलींनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 11:05 IST

जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनलॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळगोरखपूरच्या बेचन कुटुंबातील वडील पुन्हा घरी परतल्याने मुलींना आनंद तर पत्नी नाराज

गोरखपूर – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामकाज ठप्प झाले आहेत, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे बेपत्ता झालेली माणसं पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतत आहेत. गोरखपूरमध्ये अशीच एक अनोखी घटना पाहायला मिळाली, ज्या व्यक्तीवर त्याची पत्नी आणि मुलींनी अंत्यसंस्कार केले तो लॉकडाऊन काळात तब्बल १८ वर्षानंतर घरी परतला आहे.

जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते. मेहनत, मजुरीमुळे ते घरी परतले नाहीत, काही दिवसानंतर हरियाणा, दिल्ली येथे मजुरी करत स्वत:चा उदरनिर्वाह करत आणि फुटपाथवर झोपत होते. लॉकडाऊनमुळे कामकाज बंद झालं. उपासमारीची वेळ आल्यानंतर याला कुटुंबाची आठवण झाली. एका ट्रकातून तो ५ मे रोजी पादरीबाजार येथे आला. पत्नी माहेरी गेल्यामुळे तिची भेट झाली नाही, पण २ मुलींनी त्यांचे स्वागत केले.

या व्यक्तीला ४ मुली आहेत, दोन मुलींचे लग्न झाले आहे, सध्या घरात २ मुली राहत आहेत. मुलींनी सांगितल्यानुसार २००२ मध्ये सालिकाराम कमवण्यासाठी घर सोडून गेले ते कधीच परतले नाहीत. आईसह सर्व कुटुंबाला वाटलं त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१२ मध्ये वडिलांचा प्रतिकात्मक पुतळा बांधळा आणि त्यावर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर जी अधिकृतपणे कागदपत्रे होती त्याची पूर्तता केली. पण इतक्या वर्षांनी जिवंत असलेल्या पित्याला पाहून मुलींचा आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र या घटनेमुळे वडिलांना पश्चाताप होत आहे. कामकाजामुळे गोरखपूरला कधीच घरी आले नाहीत. आता याठिकाणीच काम करणार आणि मुलींचे लग्न चांगल्या घरात लावणार असल्याचं त्यांनी सांगितले.

पती घरी न परतल्यामुळे पत्नी चिंता देवी यांच्यासमोर मुलींच्या संगोपनाचं मोठं संकट उभं राहिलं. घरोघरी भांडी घासण्याचं काम त्यांनी सुरु केले. मुलींना मोठं करुन दोघींचे लग्न लावलं. सालिकाराम भलेही १८ वर्षानंतर घरी परतला असेल पण इतकी वर्ष त्यांनी कुटुंबाला दुखा:त ठेवलं. त्यामुळे नाराज पत्नी घर सोडून गेली, जेव्हा नवऱ्याची गरज होती, अन्नासाठी वणवण भटकावं लागत होतं, तेव्हा ते कुटुंबासोबत नव्हते, आता काम मिळालं नाही, खाण्याचे वांदे झाले म्हणून १८ वर्षानंतर ते घरी परतले, अशा नवऱ्याची गरज नाही, ज्याला आपलं घर आणि कुटुंब सांभाळता येत नाही असं नाराज पत्नी चिंता देवी यांनी व्यथा मांडली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Nisarga Live Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग वाढला, एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज

 हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!

लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न

कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला! 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या